Wednesday, 28 August 2013
































वारकरी संप्रदाय च का ?
||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आता थोड वारकरी संप्रदायाविषयी सांगतो ....
वारकरी संप्रदाय च का ?
मी आता पर्यंत जे काही थोडफार वाचन केल श्रवण केल माउलींच्या कृपेने त्याआधारित
संप्रदायच लक्षण सांगताना पूजनीय . गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर सांगत असत , ते अस कि .....
१) संप्रदाय अनादी असावा .
२) थोरांनी स्वीकृत असावा .
३)वेदबोधित असावा .
४) त्याला फल असावे .
हि चारी अवच्छेदके ते वारकरी संप्रदायस जुळवून दाखवतात .
ते खालील प्रमाणे
प्रथम मुळ आदिनाथापासून असल्यामुळे याला अनादित्व आहे
दुसर म्हणजेच महादेवाने स्वीकार केला . " हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा || म्हणजे थोराने स्वीकृत आहे .
तृतीय अस कि वेद्बोधीत - " वेदमार्गी मुनी गेले , त्याची मार्गे चालीलो |" " हे उपनिषेदांचे सार " " वेद शास्त्र पुरण श्रुतीचे वचन " या प्रमाणे वेद - बोधीत्व आहे .
चतुर्थ अस कि " ज्याने गह्तली मुक्तीची गवांदी || " " तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||","हे ज्ञान जयाचे हातीं तोची समर्थ इथे' मुक्ती ||" हे फल आहे . याप्रमाणे वारकरी संप्रदाय चारी लक्षणांनी युक्त आहे . या संप्रदायचे आद्यगुरु 'शिव ' असेल तरी हा वैष्णव संप्रदाय ; शंकराचे दोन शिष्य , एक उमा व दुसरे मच्छिंद्रनाथ . क्षीर समुद्राचे तीरी शंकर उमेला तत्वज्ञान सांगत असताना तेच मच्छिंद्रनाथानी ग्रहण केले होते .
त्यासाठी नाथ बाबांचं प्रमाण आहे ते खालील प्रमाणे ,
ध्यानी बैसोनी शंकर | जपे रामनाम सार ||१||
पार्वती पुसे आवडी | काय जपता तातडी ||२||
मानत तो मज सांगा | ऐसे बोलतसे दुर्गा ||३||
एकांती नेउन | उपदेशी राम अभिधान ||४||
तेंचे मच्छिंद्रा लाधले | पुढे परंपरा चाले ||५||
तोची बोध जनार्दनी | एका लागतसे चरणी ||६||
(आपण पाहू शकता अभंग एकनाथ महराज गाथा १८८९ )
तेच सार जस माउलींच्या हरिपाठात म्हणतल आहे कि
आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।1।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।2।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।3।।
तेच ज्ञान हरीपाठा मध्ये ज्ञानेश्वरीत ...आपल्या सर्वांपर्यंत आल आहे .
( टीप :- माउलींच्या चरित्र मांडत असल्याकरणाने त्याचच एक भाग म्हणून ...मी तिथे केवळ शंकर भगवान आणि नंतर लगेचच माउलींची प्रतिमा अस आहे ते ....नाहीतर कोणी आक्षेप घेण्य अगोदरच सांगितलेलं बर नाही का ? पुढे येणाऱ्या भागत सर्व संप्रदाय वंशवेल पाहू नक्कीच तेव्हा सर्व सविस्तर माहिती येईल . )
आपला ,
अक्षय भोसले .
८४५१८२२७७२

Tuesday, 27 August 2013

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
माउलीच चरित्र सर्वांसाठी  हि संकल्पना मनात घेऊन माउलींच्या कृपेने काम सुरु आहे म्हणटल आज जन्माअष्टमी आहे माउलींच्या जन्माविषयी थोड सांगाव ...म्हणून हा छोटा प्रयत्न ..
श्री ज्ञानेशांचा जन्म
निवृतीनाथांच्या दोन वर्षांच्या अंतराने ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म शके ११९७ , युवनाम संवत्सर , श्रावण वद्य ८ म्हणजेच अष्टमी गुरुवार , रोहिणी नक्षत्र , दोन प्रहार रात्र निसीथकाली चंद्र उगवत असता म्हणजे भगवान श्री कृष्णाच्या जन्मसमयीच झाला . यावरून ज्ञानेश्वर महारा
ज हे श्रकृष्णाचा अवतार आहेत , हे सहज कळून येते .
ज्ञानेश्वर तोची कृष्णनाथ | तेणे गीतेचा केला अर्थ |
जे निंदितील यथार्थ | ते मतीमंद जाणावे ||
माउलींच्या जन्माबद्दल काही संताची प्रमाण देतो ती खालिल प्रमाणे

श्री नामदेवरायनचा अभंग :-
अधिक सत्याण+णव शके अकराशती | श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी ||१||
वर्षाऋतू युवानाम संवत्सर | उगवे निशाकर रात्रीमाजी ||२||
पंचमहापतकी तारावया जन | आले नारायण मृत्युलोकी ||३||
नाम म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर | घेतसे अवतार अलंकापुरी ||४||

श्री विसोबा खेचर :-
महाविष्णूचा अवतार | श्रीगुरु माझा ज्ञानेश्वर ||१||
शके अकराशे सत्याण+णव | युवा संवत्सर नाव ||२||
वर्ष ऋतू श्रावण मास | कृष्ण पक्ष पर्व दिवस ||३||
अष्टमीच अपराति | उद्या आले निशापती ||४||
विठ्ठलराखुमाईचे कुसी | अवतरले ऋषीकेशी ||५||
विश्व तारावया आले | खेचर वंदिती पाऊले ||६||

ज्ञानेश्वर विजय , ग्रांथाचे कर्ते सच्चिदानंद बाबा हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्म शके ११९७ व मास , तिथी , वर , नक्षत्र वेळहि सांगतात . ते खालील प्रमाणे
श्री शालिवाहन भूपती | अकराशे सत्याण+णव मिती ||१११||
यावा नाम संवत्सरप्रती | श्रावण कृष्ण अष्टमी ||११२||
गुरुवार रोहिणी | पर्वकाळ परार्ध रजनी |
विठ्ठलराखुमाईचे पोटी | अवतरले जगजेठी ||११३||
ज्ञानदेव नामे सृष्टी | श्रीगुरू माझा मिरवतसे ||११४||

माझ्या वाचनात जे जे आल ते मी अपना सर्वान पुढे मांडण्याचा प्रयत्न केला ..
यात जर काही कुणाला शंका असेल तथा काही चुकीच वाटत असेल तर नक्कीच कळवा ...( मात्र अभंग सोडून ) कारण ते माझ्या संताचे आहेत आणि त्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि ते सत्यच आहे न्हवे न्हवे तर संत बोलतील तेच सत्य अस माझ मत आहे ...
(टीप :- मला काही केल्या ते १९९७ च मरठी टाईप करता अल नाही म्हणून तिथे + करून ते लिहल आहे ------> सत्याण+णव अस कारण संतानी जस लिहल ते तसच अगदी आपल्यापुढे ठेवायचं होत आणि त्या शब्द रचनेत मी किंचितही बदल करू शकत नाही मग ते ण ण जोदेलेला असेल तरही )
एकंदरीतच माउली आणि कान्हा दोन वेगळे नसून एकाच आहे ..यासाठीच इतका सारा पंक्ती प्रपंच ....राधे कृष्ण || राम कृष्ण हरी ||
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचावी हि मनी इच्छा !

आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
 — 

Friday, 23 August 2013

अजून किती दिवस हा त्रास आमच्या आई बहिणीवर ....................बंधुनो 
मित्रानो का बद्लीय आपली मनसिकता स्त्री म्हणजे खेळन नह्वे ..कधी कळणार ..
अरे ती स्त्री म्हणजे आपली आई
ती स्त्री म्हणजे आपली बहिण
ती स्त्री म्हणजे आपली पत्नी
ती स्त्री म्हणजे मैत्रीण किती भूमिका का स्त्री वर्गाच्या आणि आपल्या अशा वागणुकीचा ......??
मोठा प्रश्न निर्माण झालाय ......??
मुंबई च चित्र का बदलत चालय ...........!
अगदी आतच चित्र पाहून निशब्द झालोय मी .......कधी होणार क्रांती युवक वर्गात .......महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला ........!
 

Monday, 19 August 2013


माझ्या प्रिय बंधू भगिनींना रक्षा बंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
प्रिय ताइनो तुमचा भाऊ अक्षय भोसले .

Saturday, 17 August 2013

राम कृष्ण हरी !
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .
यांच्या वतीने गो विज्ञान चर्चा सत्र
१ ) गो हत्या बंदी कायदा
२) पंच गव्य चिकित्सा
३) गोमाता आणि आपले आरोग्य
अक्षय भोसले ,
वारकरी संप्रदाय तथा देव देश धर्म प्रचारक ..!
 

Friday, 16 August 2013

राम कृष्ण हरी ! 
सुप्रभात !
पुत्रदा एकादशीच महात्म्य सांगणारी एक कथा माझ्या वाचनात आली ती आपल्यापुढे आणि योग योग असा कि आज पुत्रदा एकादशीच नेमकी आहे ...
महाराज युधिष्ठिर यांनी विचारले,'हे परमेश्वरा! आता आम्ही आपल्याला विनंती करतो की, पौष शुक्ल एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते, त्याचा विधी काय व व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते.' 

भक्तवत्सल परमेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, 'हे राजन! या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी होय. या दिनी विष्णू नारायणाची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही. व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी, विद्वान व धनवान होतो. यासंदर्भात एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका.'

भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत असे. त्याला संतान नव्हते. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. ती निपुत्रिक असल्याने नेहमी दु:खी असायची. राजाकडे धन-संपत्ती, हत्ती, घोडे, मंत्री- संत्री सगळे होते, मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते.

मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल, याच विचारात राजा असायचा. मुलगा नसल्याचे आपण पुर्वज व देवाचे ऋण कसे चुकवू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते. ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो, अशी राजाची समजूत झाली होती. कुलदीपकासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे असे,राजाला सारखे वाटायचे.

ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे, तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पुर्वजन्माच्या पुण्‍याईने व्यक्तीला पुत्र, धनप्राप्ती होत असते. राजा अशा विचारात रात्रंदिवस गर्क असायचा.
एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला. मात्र, आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा-फुलाना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्तसंचार करत होते. हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावाधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता- 'मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राम्हण देवताला भोजन करून तृप्त केले तरी ही माझ्या वाट्याला दु:खच का आले असावे?'

विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे-तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहुबाजुंनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला.
राजा पहातच एका ऋषीचे म्हटले - 'हे राजन! आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात असेल ते वर मागा.'हे एकताच राजा त्यांना विचारले, 'महाराज आपण कोण आहात, येथे येण्याचे प्रयोजन काय?'

राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले, हे राजन! आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यास आले आहेत.

हे ऐकून राजाने म्हटले,'ऋषीदेवता मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या.'

ऋषीमुनी म्हणाले -'हे राजन! आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल.
ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे ‍व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. राजाला कुल‍दीपक मिळाला. राजाचा पुत्र अत्यंत शूरवीर,यशस्वी व प्रजापालक होता.

तात्पर्य हेच की, पुत्र प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो व्यक्ती या व्रताचे माहात्म्याचे पठण किंवा श्रवण करतो त्याला मृत्युपश्चात स्वर्गात जागा मिळते.
@webduniya माहितीकरिता धन्यवाद ...

अक्षय भोसले .
वारकरी संप्रदाय तथा देव , देश ,धर्म प्रचारक

Thursday, 15 August 2013

मा. अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा   राष्ट्रपतीच्या शौर्यपदकाणे सन्मान  त्यांचे वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य ( सबंध भारत ) परिवारातर्फे मनस्वी अभिनंदन !
अक्षय भोसले ,
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य ( सबंध भारत )

Sunday, 11 August 2013

आपल्या सेवेत ...
जास्तीत जास्त लाभ घ्या ...
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती..
अक्षय  भोसले 

आपल्या सेवेत ...
जास्तीत जास्त लाभ घ्या ...
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती..
अक्षय  भोसले

Saturday, 10 August 2013






माझी वारी ....

                                                                 आळंदी ते पंढरपुर

आदरणीय श्री. शामसुंदर मुळे सर यांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी ( देवाची ) च्या प्रमुख विश्वस्त पदी नियुक्ती झल्याबद्दल हर्दिक अभिनंदन !
शुभेच्छुक :- अक्षय भोसले आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान परिवार 
रियाज..
Akshay Bhosale
सुट्टीवर येताना मुलगा आईसाठी साडी घेवून येणार होता …
सुट्टीच्या १० दिवस अगोदरच आला … पण तिरंग्यात लपेटून …
त्या आईचा आक्रोश मुक्या बहिऱ्या आणि आंधळ्या सत्तेला केव्हा कळणार..
माझ्या शहिद जवानांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली !