Tuesday, 17 December 2013

एक वारकरी - समाजसुधारक अण्णा हजारे

एक वारकरी काय करू शकतो ? - पाह्यच अण्णा हजारे यांना पहा मग ! 
अहो अस बघत काय बसलाय तुम्ही लोकपाल पास झाल कि राव  जास्तीत जास्त शेअर करा आणि दाखवा सर्वाना वारकरी वर्गाची ताकत

Sunday, 15 December 2013

दत्तगुरूंचे २४ गुरु

दत्तगुरूंचे २४ गुरु 


:: दत्तरूपी अवधूताचे २४ गुरु :: 

१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता

पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी. पृथ्वी कडून अवधुतांना सहिष्णुता आणि सहनशीलता हे गुण शिकायला मिळाले. पृथ्वीवरील सर्व जीव तिच्यावर ह्या न त्या मार्गाने आघात करीत असतात. कधी तिला नागरून, कधी खणून, कधी पोखरून तर कधी मलविसर्जन करून परंतु पृथ्वी समान भावाने आणि आपल्या सहनशील गुणाने सर्वांना तिच्या काळजातून पिक देते ज्यामुळे सर्व मानवसृष्टी आपले उदरभरण करते. पृथ्वी ठाई सर्वांना जागवण्याची शक्ती आहे. ती सर्वांना नुसते पिकाचं नव्हे परंतु अनेक रत्ने, खनिजे सुद्धा देते आणि ते देखील निरपेक्ष भावनेने.

१.१. वृक्ष ( उपगुरु ) :: परोपकार

वृक्षाचा परोपकार हा गुण अवधूतांनी ग्रहण केला. वृक्ष निरपेक्ष मनाने, सर्व प्राणीमात्रांना छाया देतो, पक्ष्यांना निवासाचे स्थान देतो, सर्वांना गोड फळे देतो. कुठलाही दुजाभाव वृक्षाठाई नाही. आपण त्याला दगड मारला तरी वृक्ष त्याच्या परोपकारी वृत्तीला कधीच सोडत नाही. वृक्षाच्या पानांचा, फुलांचा, फळांचा, खोडाचा सर्वतोपरी उपयोगच होतो. अनेक छोटे - मोठे जीव वृक्षावर अवलंबून असतात परंतु त्याने त्याचा सार्थ अभिमान न बाळगता ते आपल्या सेवेस सदैव रुजू असते.

१.२. पर्वत ( उपगुरु ) :: संपादन आणि संचय

पर्वत आपल्या उदरामध्ये अनेक खनिजे, रत्ने ह्याचे संपादन करून संचय करून ठेवते. आणि मानवास त्याचा उपभोग घेता येतो. इतकेच नव्हे तर ते पाण्यासारखा मुलभूत रत्नाचाही, पर्वत स्वतःमध्ये संचय करते. परंतु वेळ आली कि हे सर्व मानवालाच अर्पण असते. तसेच मानवांनी ज्ञान संपादन करून त्याचा संचय करावा आणि इतरांना त्याचा लाभ निरपेक्ष मनाने व बुद्धीने उपभोगू द्यावा.

२. वायु :: विरक्ती

वायु हा मुक्त संचारी आहे. तो सर्वांना स्पर्शून जातो. सुगंध, दुर्गंध ह्यांना देखील स्पर्श करतो परंतु तो ह्यातून मुक्त आहे. तो कुणातही अडकून न राहता त्याचा तो मुक्त संचार करीत राहतो. उष्ण प्रदेश असो अथवा शीतकटिबंध वायु त्याची मार्गक्रमणा पूर्ण करतो. मानवाने वायूचा हा गुण आत्मसाद करावा. कोणत्याही गुण- दोषांत अडकून न राहता श्रुतीप्रतिपादित मार्गक्रमणा करावी. कोणत्याही प्रदेशातून विहार करीत असता तेथेच खिळून राहू नये.

३. आकाश :: अचल, अविनाशी

आकाश स्थिर, अचल आणि अविनाशी गुणांनी युक्त आहे. राजाचा महाल असो अथवा गरीबाची झोपडी आकाश त्याचे पांघरूण सर्वांवर पांघरते. तिथे लहान मोठा हा भेदभाव नाही. आकाश सर्वव्यापी आहे. निश्चल आहे. निर्विकार आहे. त्याच प्रमाणे आत्मा हा सर्वव्यापी आहे. अविनाशी आहे. जसे आकाश ढगांनी व्यापलेले असले तरी आकाशाचे सतंत अस्तित्व टिकून आहे त्याच प्रमाणे शरीर आवरणामध्ये आत्मा झाकलेला जरी असला तरी कोणत्याही स्थितीचा चांगल्या - वाईट परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.

४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता

उदक म्हणजेच पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे निर्मल राहून इतरांच्या मनातले मलीन विचार साफ केले पाहिजे. पाण्याचे अनेक गुणधर्म विषद करता येतात. पाण्याला ज्या आकारामध्ये आपण टाकतो तो त्या आकाराचे रूप स्वतः धारण करतो परंतु स्वतःचे सत्त्व सोडत नाही. त्याचप्रमाणे मानवाने सर्व परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वतःचे सत्त्व टिकवले पाहिजे. ज्या प्रमाणे पाण्यात सर्व घटक विरघळवण्याची क्षमता आहे तसेच पाणी त्यात सामावणारे गढूलत्व तळाशी ठेवते आणि स्वछ निर्मल पाणी वरती राहते . ह्या गुणधर्मांचा अवलंब मानवाने करून इतरांच्या मलीन कर्मांना तळाशी स्थान देऊन निर्मल मनाने त्यांच्या पातकाचे क्षालन करावे. उदक हे सर्वांसाठीच ज्या प्रमाणे अमृत बनून वाहत असते. त्याप्रमाणे मानवाचा सहवास अमृतासम भासावा ह्याकरिता पाण्याचे हे गुणधर्म आचरणात आणावेत. पाणी जर एकाठिकाणी साचून राहिले तर त्याचे दबके तयार होते. आणि दबके हे साचून राहिल्यानी कालांतरानी दुर्गंधी निर्माण करते. त्यामुळे ज्ञानार्जन करताना मानवानी कुठेही थांबून साचलेल्या दुर्गंधीयुक्त दबक्या समान न होता एका निर्मल स्वछ झर्याचे गुणधर्म आचरून सतत विहार करावा. पवित्र राहून आपल्या मधुरतेने दुसर्यांना सतत सुखवीत राहणे हाच खरा पुरुषार्थ.

५. अग्नी :: पवित्रता

अग्नी.. अतिशय पवित्र अशी अग्नी तिच्या मध्ये सर्व चांगले - वाईट सामावून घेते. तिच्या तेजाने सर्व मळभ नाहीसे करते. कोणताही दुजाभाव तिच्यामध्ये नाही. आणि आपल्या तेजाचा तिला गर्व नाही. राखेखाली दुमसत राहून आपल्या तेजाला राखेची किनार ती जोडते. आणि एक महत्वाचा गुण म्हणजे सर्वांना उब प्रदान करते. तेव्हा अवधूत म्हणतात कि त्यांच्या पाचव्या गुरु कडून त्यांनी हि शिकवण घेतली कि मनुष्याने अग्नी प्रमाणे तप करून ज्ञानाने तेजस्वी होणे गरजेचे आहे. अग्नीची पवित्रता बाळगून सर्वांसमवेत समान आचरण ठेवावे. आपल्या कुठल्याही कृत्याला अहंकाराची झाल लागू ना देता आपल्या आत्म्याचे तेज जपावे.

६. चंद्र

चंद्र १६ कलांमधून भ्रमण करतो. अमावस्येची कला तिथपासून पौर्णिमेपर्येंत असे १६ आकार चंद्र घेतो परंतु चंद्राचे असे कमी जास्त होणे चंद्रास बाधक नाही. त्याचप्रमाणे जन्म, वाढ, स्थिती, विकास, क्षय आणि नाश हे सहा विकार देहाला लागू पडतात. आत्मा ह्यातून मुक्त आहे. ह्याचे कारण असे कि चंद्राच्या कला ज्या आपण बघतो त्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या योगाने, परंतु तत्वतः चंद्र तसाच आहे. तसाच आपल्या शरीर ज्या विकारांमधून जाते त्यामुळे आत्म्याचा स्थायी भाव बदलत नाही.

७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार

सूर्य आणि मानवाचा आत्मा हे अवधूतांना एकसमान भासतात, कारण ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता सूर्य पाण्यात बुडून जात नाही किंवा सूर्य गढूळ होत नाही. ते पाणी वाहताना जर पहिले तर सुर्यचे प्रतिबिंब विकृत जरूर होईल परंतु मुलतः सूर्य ह्या सर्व विकारांपासून आलिप्त आहे, तसेच आत्मा हा मानवी शरीरच्या कोणत्याही विकारास बाधक नाही तो सर्वार्थ असून आलिप्त आहे. मानवाचा देह कसाही असो, कोणतेही कर्म सिद्ध करत असो तरीही आत्मा त्याचे अस्तित्व स्वतंत्र राखते. आत्म्याची शरीराबरोबर सोबत हि एखाद्या प्रतिबिंबा इतकीच असते.
सूर्याचा दुसरा गुण म्हणजे सूर्य दररोज सर्वांना त्याच्या सूर्य किरणांनी तेज प्रदान करतो. अंधार नाहीसा करतो. कोणताही मनात भेदभाव न बाळगता सर्वांवर आपल्या तेजाची पाखरण करतो. अन्नधान्य पिकवण्यास सहाय्यक ठरतो. जमिनीवरील पाण्याचा संचय करून आवश्यक त्यावेळी पर्जन्य वृष्टी करून सर्वांची तृष्णा शालन करतो. त्याप्रमाणे मानवाने सूर्यप्रमाणे आपल्या ज्ञानाच्या तेजोकिरणांनी सर्वांच्या हितार्थ अज्ञानाच्या अंधाकाराचे पतन करावे. सर्वांसोबत समान वागणूक ठेवावी.

८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती

एका वनामध्ये अवधूतांनी एक कपोत पक्ष्याच्या जोड्याला बघितले. जे एकमेकांच्या प्रेमात लुब्ध होऊन रानावनात संचार करीत. एकमेकांवर जीवापाड प्रेम करून त्या कपोतानी त्याचा सुंदर असा संसार थाटला होता. काही दिवसांनी कपोती गरोदर राहिली आणि तिनी काही अंडी दिली. कपोत आणि कपोती त्या अंड्यांना प्रेमची उब देत असे आणि त्यांचे दिवस असेच प्रेमात चालले होते. त्या अंड्यातून गोंडस पिल्ले बाहेर आली. आपल्या पिल्लांना उत्तम दर्ज्याचा आणि मुबलक चारा मिळावा ह्यासाठी कपोत आणि कपोती आता जीवापाड मेहनत करू लागेल. आणि एक दिवस आपल्या पिल्लांना चारा आणायला गेलेल्या कपोत आणि कपोतीच्या पिल्लांना फासेपारध्यांनी आपल्या जाळ्यात अडकून टाकले. आपल्या पिल्लांना जाळ्यात तळमळताना पाहून कसलाहि विचार न करता कपोती स्वतः जाळ्यात धावून गेली आणि तिने आपले प्राण गमावले. आपल्या पिल्लांना आणि कपोतीला असे प्राण गमवलेले पाहून कपोताने आपले प्राण आपल्या कुटुंबासाठी दिले आणि तो स्वतः जाळ्यात गेला. कुटुंबाबद्दलची आसक्ती विवेक बाजूला ठेवायला लावते. संसारच्या मोहातून विरक्त होऊन मानवानी सुखार्जन केले पाहिजे नाहीतर तो काळाचा भक्ष होईल.

९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट

अजगराला गुरु करताना त्याची उदासीनता लक्षात आली. देहानी विशाल, शक्तींनी अचाट, सामर्थ्यानि बलवान अश्या अजगराकडे आपण बघतो तेव्हा तो शांत, अविचल, स्थिर भासतो. अजगर त्याला त्याच्या प्रारब्धाने जे काही अन्न भक्षणास मिळेल ते तो गोड समजून भक्षण करून निपचित पडून राहतो. मग ते अन्न थोडे असो कि जास्त, कडू असो कि गोड, अजगरास त्याची भ्रांत सतावित नाही. तो कितीही संकटे आली किंवा त्याला कितीही डिवचले, मारले तरी तो वार करीत नाही. आहे त्यात तो संतुष्ट राहून आपले जीवन व्यतीत करतो. मानवाने देखील अजगराच्या ह्या गुणाप्रमाणे आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे काही मिळेल जसे मिळेल त्याचा स्वीकार करून सुखी राहिले पाहिजे. लोभाला दूर लोटून आत्मसंतुष्टी प्राप्त केली पाहिजे.

१०. समुद्र :: समतोल

समुद्राची समतोल आणि धीरगंभीर वृत्ती अवधूतांच्या नजरेतून सुटत नाही. अतिशय विशाल अश्या समुद्राची खोली आपल्याला निश्चित मोजता येत नाही. सदैव प्रसन्नतेने वाहणाऱ्या समुद्राला प्रवाह नाही. तो निर्मळ आहे. पर्जन्य वृष्टी होऊन नद्यांना पूर येतो आणि अनेक नद्या समुद्रास येऊन मिळतात ह्याच्या व्यर्थ गर्व बाळगून समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. किंवा निसर्गातल्या सुकलेल्या वातावरणाने समुद्र कधी आटत नाही. ह्याचाच अर्थ असा मानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या सुखाने कधीही फुलून जाऊ नये अथवा दुःखाने खचून जाऊ नये. समुद्र त्याच्या खोलीचा थांग लागू देत नाही परंतु अनेक रत्नांची आपल्यावर परमार करतो. अनेक रत्नसाठा हा समुद्राच्या पोटातून मानवाला उपभोगायला मिळतो. त्याचप्रमाणे मानवाने आपल्या गुणांचा थांग लागू न देता त्याचा उपयोग दुसर्यांच्यासाठी जरूर करावा.

११.पतंग :: मोहाचा त्याग

पतंग हा असा एक कीटक आहे जो फुलपाखराप्रमाणे असतो परंतु त्याला दिव्याच्या तेजाची अति ओढ असते. दिव्याच्या प्रकाशाला जाऊन तो बिलगतो, परंतु त्या दिव्याला बिलगल्यानी त्या पतंग्याचा जळून मृत्यू होतो. तरीही ते पाहूनही दुसरा पतंग त्याचा मोह आवरू शकत नाही आणि तोही मृत्युच्या पाशात ओढला जातो. पतंग्याच्या ठाई असलेला लोभ त्याच्या विवेकाचा मारक होतो त्यामुळे अति मोहामुळे मानवानी कोणत्याही लोभस बळी पडू नये आणि आपला काळ ओढवून घेण्यासाठी कारणीभूत होऊ नये. माणसाने कोणत्याही परिस्थितीत विवेकशून्य बनू नये. ह्याकरिता पंतगाला गुरु बनवले.

१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त

भ्रमर म्हणजे भुंगा हा प्रत्येक फुलाचा रसिक बनतो आणि प्रत्येक फुलाचा आस्वाद घेण्यासाठी तयार होतो. ज्याप्रमाणे भुंगा फुलांमधील रस ग्रहण करतो त्याप्रमाणे योग्याने ज्ञान ग्रहण करावे सारग्रहण करावे. परंतु भ्रमर ज्याप्रमाणे फुलाच्या प्रेमात पडून त्या फुलाचा आसक्त होतो, फुलाने आपली पानं मिटून घेतली तरी त्या फुलाला दुखापत होऊ नये म्हणून हालचाल न करता स्तब्ध राहतो व आपला काल ओढून घेतो त्याप्रमाणे योगी माणसांनी कसल्याही मोहामागे आसक्ती दर्शवू नये.

१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ

मक्षिका (मधमाशी) :: इथे अवधूतांनी मधुहा आणि ग्राममाशी ह्यांची तुलना केली आहे. मधमाशी, अतिशय कष्ट करून, श्रम करून मधाचा दिवस न रात्र संचय करते. तिचे पोळे अश्या उंच ठिकाणी ती बांधते कि तिथे इतरांना पोहोचणे कठीण असते. मधमाशी साठवलेल्या मधाचा स्वतःही उपभोग घेत नाही आणि इतरांनाही त्या साठवलेल्या मधाचा उपभोग घेऊ देत नाही.परिणामतः मध गोळा करणारे लोक येतात आणि सर्व मध तर नेतातच पण मधमाशीने कष्टाने बांधलेले पोळे तोडून-मोडून जातात.

ग्राममाशी :: ह्याच्याच अगदी विरुद्ध ग्राममाशी ती कधीच कोणत्या गोष्टींचा, अन्नाचा संचय करत नाही. जे मिळेल ते ती खावून मोकळी होते आणि आपली उपजीविका अव्याहत चालू ठेवते. निवाऱ्याची चिंता तिला नसते. ह्याचाच अर्थ असा कि योगी पुरुषाने लोभाची गाठोडी सोबत बाळगून दुखी, कष्टी होऊ नये. उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागून जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे. निवाऱ्याची चिंता योग्याने करू नये आणि ज्ञान सोडून धनाचा, अन्नाचा अथवा कोणत्याही गोष्टीचा संचय योग्याने करू नये.

१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन

शक्तिशाली, बुद्धिवान प्राणी म्हणजे हत्ती. उन्मत्तता आणि प्रचंडशक्ती असून देखील लहान - थोर असा भेदभाव न करता सदैव नम्रतेने खाली बघून चालणारा आणि सर्वांना वंदन करणारा गज जेव्हा कामवासनेला भुलतो तेव्हा स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरतो. हत्तीला पकडण्यासाठी बनवलेल्या खड्डया मध्ये हत्तीणीची लाकडी प्रतिकृती उभारून मानव त्यावर हत्तीणीची कातडी पांघरतात. तिच्या वासाने हत्ती आपली विवेकबुद्धी विसरून कामासुखास बळी पडतो आणि मानवाचा दास होतो. त्याचप्रमाणे योग्याने नम्र जरूर असावे परंतु स्त्रीसुखास भुलून आपला विवेक सोडू नये नाहीतर काळ नक्कीच विनाश बनेल.

१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग

वाऱ्याप्रमाणे अतिशय वेगवान असे मृग नेहमी भीतीनी ग्रस्त असते. आपला जीव मुठीत घेऊन भिरभिरत्या नजरेने बघत असते. चपळता असूनही मृगाची चंचलता त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते. कस्तुरी-मृग मधुर गायनाला, वाद्याच्या मधुर ध्वनी लहरींवर लुब्ध होऊन पारध्याच्या जाळ्यात अडकतोच. मृगाची बेसावधवृत्ती, चंचलता, आणि नादाप्रती अति लोभापायी मृगाला पराध्याचे शिकार व्हावे लागते. योगी पुरुषाने ह्याचे जरूर भान ठेवावे. आसक्ती अथवा लोभापायी चंचल बनू नये. बेसावध राहून एकदा का काळ ओढवून घेतला कि दुसर्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो हे नीट समजून योग्याने आपले आचरण शुद्ध ठेवावे. नादलुब्धते पासून योग्याने दूर राहावे. भगवंताच्या गुणांचे वर्णन अथवा ॐकार स्वरूप नाद ह्यांशिवाय इतर नाद हे योगी पुरुषाला साजत नाही.

१६. मासा :: ओढ, आसक्ती

मासा पाण्यात राहणारा एक जीव. परंतु त्या माश्याला पाण्याची इतकी ओढ, इतकी आस असते कि तो पाण्यावाचून एक क्षण जिवंत राहू शकत नाही. त्याची पाण्याशी असलेली आसक्ती, ओढ हि परमोच्च असते. माश्याला पाण्याहून विलग करता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताविषयी योगी पुरुषाला तितकीच ओढ असावी. भगवंताच्या नामस्मरणाने योग्याचे प्रत्येक क्षण व्यातीती व्हावेत. भगवंत आणि भक्त एकरूप झाले पाहिजेत कि भगवंतापासून भक्ताला विलग करणे म्हणजे शरीरापासून आत्म्याला विलग करणे.
माश्याचा अजून एक गुणधर्म म्हणजे रसनेची तृप्ती होण्यासाठी गळाला अडकवलेले अन्न मासा ग्रहण करायला जातो आणि आपला मृत्यू ओढवून घेतो त्याप्रमाणे योग्याने त्याच्या जिव्हेच्या स्वादास अति महत्व देणे व्यर्थ आहे.योग्याने परमात्म्यावर विश्वास ठेऊन मिळालेली भिक्षाच संपूर्ण मानवी.

१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन

पिंगला म्हणजेच एक वेश्या, जी आपले शरीर, द्रव्यासाठी विकते आणि कामसुखात लुब्ध राहते. अश्या स्वैराचारीणीला श्री दत्तगुरूंनी कसे काय गुरु बनवले? तर त्याचे कारण,आत्मजागृती आणि परीवर्तन. वेश्या जी धनामागे, वासेनेमागे सर्व श्रुंगार करणारी एक स्त्री, जीची सावली देखील अपवित्र वाटावी. जी पुरुषाला आपल्या शारीरिक सुंदर्यावर नादी लावणारी, हि वारांगना. जि सर्व सुख भोगून देखील ती जणू अतृप्त होती. अनेक दिवस आपल्या मादक सौंदर्याचा व्यर्थ गर्व बाळगून जिने धनाचा मोठा संचय केला. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही तसा तो तिच्या साठी देखील थांबला नाही. जसे दिवस सरले त्या दिवसांसोबत वेश्येच तारुण्य हि सरले आणि कोणीही तिच्याकडे बघेनसा झाले. तिचे सौंदर्य आता काहीच कामाचे नव्हते हे तिला सुधा कळून चुकले परंतु एक वेडी आस लाऊन ती रोज नटून दारात उभी असे, पण तिला बघणार कोण. अश्या परिस्थितीत तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. ज्या गोष्टींना तिने अनन्य महत्व दिले ते फोले होते हे तिला कळून चुकले. आणि ती परमात्म्याला शरण आली. श्रीहरींनी तिचा उद्धार केला. तिला झालेल्या आत्मजागृतीने आणि तिच्या मधील झालेल्या परीवर्तनामुळेच तिला गुरु बनवले. योग्यांनी देखील भौतिक सुखाचा वाली बनू नये. आपल्याकडे असलेले तारुण्य हे चिरकाल नाही हे लक्षात घ्यावे. शरीराचे चोचले पुरवण्यापेक्षा आत्मा आणि विवेक ह्यांना जागृत ठेवावे हीच शिकवण ह्या उदाहरणातून शिकायला मिळते.

१८. टिटवी :: लोभाचा त्याग

टिटवी म्हणजे शिकारी पक्षी. एकदा एका जंगलात अनेक टिटवे पक्षी होते. त्यांच्यातल्याच एका टिटव्यानी एक मोठा मांसाचा गोळा शोधून आणला परंतु जसा त्या सर्व टिटव्यांना त्या मांसाचा वास लागला तसे ते सगळे तिथे गोळा झाले. आणि त्यांनी त्या टिटव्याला चोची मारायला सुरवात केली. असंख्य वेदना होत असूनही तो टिटवा ओरडू शकत नव्हता, कारण तो ओरडला तर मांसाचा गोळा चोचीतून खाली पडेल. पण तो मांसाचा गोळा मिळत नाहीये हे पाहून त्या इतर टिटव्यांनी त्याला पंखांनी फडाफड मारायला सुरुवात केली. आता मात्र वेदना असह्य होऊन त्याने चोच उघडली आणि तो मांसाचा गोळा खाली पडला. तसे ते सगळे टिटवे तिथे जमा झाले आणि त्या एका गोळ्यासाठी भांडू लागले. ह्यावरून योग्यांनी हे लक्षात घ्यावे त्या टिटव्याने त्याला होणारी वेदना दूर करायला त्याला झालेला त्या मांसाच्या गोळ्याचा त्याग केला म्हणजेच लोभाचा त्याग करणे म्हणजेच वेदनेपासून मुक्तता.


१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता

लहान मुलांना देवाचे दूत म्हणतात ते काही खोटं नाही. लहान मुल कोणताही भेदभाव न बाळगता सगळ्यांचा त्वरित स्वीकार करतात. त्याला आपले विश्वच इतके प्रिय असते कि त्याला राग, लोभ, मद, मत्सर, चिंता, त्रागा ह्या गोष्टींची भ्रांतच नसते. मान-अपमान ह्या गोष्टी लहान बालकास शिवत नाहीत. कुतुहूल आणि निरागसता हे गुण बालकाला निसर्गातच देणगी म्हणून मिळतात. कोणी लाडाने खेळवले अथवा कोणी रागाने झिडकारले तरी त्याला त्याचे दुखः होत नाही कि अति आनंदात ते मुल रममाण होत नाही. योग्यांनी हा बालकाचा गुण अंगी बाळगावा. निरागस आणि सरळ वृत्ती ठेवावी. कोणत्याही गोष्टीसाठी राग मानू नये किंवा आनंदात बुडून जाऊन परमात्म्याला विसरू नये.

२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य

कोण्या एका कुमारिकेला घरात राखण करायला ठेऊन तिचे आई-वडील कुलस्वामिनीच्या यात्रेला जातात. त्यावेळी अचानक त्या कुमारिकेचा विवाह ज्या घरात ठरला आहे त्या घरातली मंडळी घरी येतात. घरात कोणी नाही परंतु त्यांचा आदरसत्कार करायला हवा ह्या विचारात ती कुमारिका काहीही न बोलता त्यांच्या आदर सत्काराच्या तयारीला लागते. घरामध्ये तांदूळ सडलेले नाहीत हे पाहून कुमारिका लगेच तांदूळ सडू लागते परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागते. पूर्वीच्या काळी रिवाज असे कि स्त्रियांच्या ककणांचा आवाज होणे बरे नाही, त्यावरून त्या मुलीची अथवा स्त्रीची स्वभाव परीक्षा होत असेल. तेव्हा आपल्या ककणांचा आवाज झाला तर वर पक्षाला वाटेल कि मुलगी दांगट आहे म्हणून त्या कुमारीकेनी आपल्या हातामाध्ले दोन कंकण काढून ठेवले आणि पुन्हा तांदूळ सडू लागली पण तरीहि आवाज होताच होता. त्या कुमारिकेने हातामध्ये एक-एक कंकण ठेऊन आपले काम सुरु केले. ह्यावरून योगी पुरुषाने असे लक्षात घ्यावे कि अनेकजण जिथे एकत्र होतात तिथे कोलाहल होतो आणि दोन जणांमध्ये संवाद. कोणताही गट बनवून राहण्यापेक्षा योगी पुरुषाने साधनेसाठी एकाकीपणा आचरावा.

२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी

सर्प ह्या एकविसाव्या गुरुकडून एकांतवासाचा बोध होतो. सर्प हा एकाकी जगणारा जीव आहे. तो स्वतःचं घरसुद्धा बांधत नाही. मुंग्यांनी कष्टाने बनवलेल्या आयत्या वारुळात तो निवांत जाऊन वास्तव्य करतो. आणि पुन्हा मनात येईल तेव्हा मुक्तपणे संचार करीत राहतो. सर्प सहसा कोणाच्याही दृष्टीक्षेपात न पडता त्याचा तो एकटा विहार करतो. ह्यावरून योगी माणसाने मुक्तासंचारी असावे. निवाऱ्याची विवंचना न करता मुक्तसंचार करावा जिथे विसाव्यास जागा मिळेल तिथे काही क्षण विसावा घेऊन पुन्हा आपली मार्गक्रमणा चालू ठेवावी. त्याचप्रमाणे एकांतवास पत्करावा. योग्यांनी वाईट अथवा चांगल्यांची संगत न करता आपल्या जीवनाची एकाकी वाटचाल करावी जी त्याला परमेश्वरा नजीक पोहोचवेल.

२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त

शरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा कारागीर. एक दिवस अवधूतांना एक अपूर्व अनुभव आला, एक साधा बाण तयार करणारा कारागीर आपल्या कामामध्ये इतका गर्क होता कि त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा पूर्ण विसर पडला. तो आपले काम पूर्ण एकाग्र चित्ताने करत बसला होता. त्या शरकर्त्याच्या झोपडी शेजारून त्या नगरीच्या राजाची राजस्वारी पूर्ण जल्लोषात, वाजत-गाजत, सरंजामासहित गेली. परंतु त्या कोणत्याच गोष्टीचा त्या कारागीरावर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा त्या राजाचा सेवक खास त्या शरकर्त्या जवळ आला आणि त्याला विचारले कि, "ह्या वाटेने राजेसाहेबांची स्वारी जाऊन आपण आपले कार्य करीत बसलात, का आपल्याला ह्याची जाणीव झाली नाही?" तेव्हा तेवढ्याच नम्रपणे त्या कारागिराने उत्तर दिले, "महाशय मी माझ्या कर्मामध्ये गर्क असल्या कारणाने मला कसलेच अवलोकन झाले नाही, त्याबद्दल क्षमा असावी." ह्यावरून योगी पुरुषाने एकाग्रता आणि बाळगून ईश्वर चिंतन करावे. परमेश्वर स्वरूपात विलीन होऊन जावे. हाच मार्ग योग्याला मुक्ती प्राप्त करवून देऊ शकतो आणि सर्व

२३. कातणी (कोळी) :: निर्विकार

ऊर्णनाभी म्हणजे कोळी किंवा कातणी. हा कोळी अतिशय निर्विकारपणे जगतो. शाश्वततेचा लोभ करीत बसत नाही. कोळी त्याच्या पोटातून निघणाऱ्या द्रव्यापासून तंतू तयार करून त्याला हवे तसे जाळे विणतो. त्या जाळ्यावर अनेक क्रीडा करतो, लटकतो पुन्हा ते बनवलेले जाळे स्वतःच खाऊन टाकतो आणि पुन्हा नवीन जाळे तयार करतो. कातणी कोणाचाही बांधक नाही मुक्तपणे हव्या त्या जागी हवे तसे जाळे पुन्हा पुन्हा निर्माण करतो. ह्यावरून योग्याने हे लक्षात घ्यायला हवे कि परमेश्वर निराकार, निर्विकार आहे. तो कोणाचा बाधक नाहीये. त्यामुळे परमेश्वराला वाटले तर तो संपूर्ण विश्वाची पुनर्रचना करतो. म्हणूनच ह्या जगात घडणाऱ्या घटनांना योग्यांनी अधिक महत्व देणे व्यर्थ आहे. परमेश्वरा व्यतिरिक्त काहीच शाश्वत नाही हे सत्य मानावे, आणि परमेश्वर आज्ञेप्रमाणे चालावे.

२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास

कुंभारीण माशी म्हणजे भिंगुरटी, एक अळी पकडून आणते आणि तिला भिंतीशी बांधलेल्या घरट्याला बांधून ठेवते. ती अळी मरणाच्या भीतीने ग्रस्त होऊन त्या कुंभारीण माशीचा तीव्र ध्यास घेते. इतका कि त्या ध्यासापायी अळीचे कुंभारीण माशीत रुपांतर होते, आणि ती अळी उडून जाते. त्याप्रमाणे योगी पुरुषाने परमेश्वर प्राप्तीचा तीव्र ध्यास धरला पाहिजे. ईश्वराशी पूर्ण एकरूप होऊन जावे. इतके कि भक्त आणि देव ह्यांना ह्याचात फरक जाणवू नये. ईश्वराचा अंश बनून त्या सर्वात्मका भगवंतात भक्ताने पूर्णपणे विरघळून जावे. त्या परमात्म्यालाच आपले अस्तित्व बनवावे. परमेश्वर प्राप्तीतच योगी पुरुषाचा पुरुषार्थ साध्य होतो. ह्या करिता अवधूतांनी कुंभारीण माशीला आपला २४ वा गुरु बनवले.
असे एकून अवधूत चिंतन दत्त गुरु यांचे २४ गुरु ...

Friday, 13 September 2013

|| श्री ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
माउलींच्या जीवनातील काही भाग ...आज इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय .
आई वडील गेल्यावर हि भावंडे बरेच दिवस आपेगावी राहिली , असे मुक्ताबाईंच्या अभंगावरून दिसते ., निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न | संभाळी सोपान मजलागी || मुक्ताबाई म्हणतात , ' देवा आईवडील गेले तेव्हा मी लहान होते . निवृत्ती व ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न मागण्यास जात असत .' ( कारण तिथे अपेगावी ब्राह्मणांची घेरे नसल्यामुळे मराठ्यांकडेच भिक्षा मागावी लागत होते व तयंचे शिजलेले अन्न कसे घेतील ? म्हणून कोरान्नाचे अन्न मागत असत .) जेव्हा निवृत्ती व ज्ञानेश्वर कोरान्न मागण्यास जात असत , तेव्हा सोपानदेव घरी मुक्ताई ला सांभाळीत असे . त्यांना करमणूक म्हणून निवृत्तीनाथांनी निवृत्तिपट व ज्ञानेश्वरांनी ज्ञान पट ( आपण जी प्रतिमा खाली पाहता तोच हा ज्ञानपट असे खेळण्याकरिता करून दिले होते . ते खेळण्याची रीत अशी कि ,या ज्ञान पटात १ ते ७३ व निवृत्तिपटात १ ते ८५ अंक आहेत . प्रत्येक अंकांना जन्म , माया वैगेरे संज्ञा आहेत . काही साधन वाची व काही फलवाचि संज्ञा आहेत . शुभ कर्माचे फल उत्तम लोकांची प्राप्ती व अशुभ कर्माचे फल अधोगती असे आहे . उदा . ज्ञान पटात १० अंकाची संज्ञा ताप आहे . तय्तून शिडी निघून ती स्वर्ग या तेवीस अंकाच्यात गेले आहे . शिडीने वर जायचे . तसेच यात काही साप आहे त्या सापाच्या मुखातून खाली शेवट असेल त्या गृहात जायचे . याची खेळण्याची रीत अशी कि , हातात सहा कवड्या घेऊन डाव टाकावा .तय्त जेवढ्या कवड्या चित्त पडतील , तितके अंक मोजून गोटी पुढे पुढे वर सरकवत जाने . जर शिडीच्या घरात गोटी गेली तर एकदम शिडी जेथवर जाईल तिथ पर्यंतवर जाने व कदाचित सापाच्या मुखात गेली कि मग त्याच्या शेपुटाच्या घरात जाने . शेवटी असेखेळता खेळता ज्याची मोक्षाच्या घरात गेली ज्याची गोटी तो जिंकला व दुसरा हरला . हा दोघांचच खेळ आहे . सध्या आपण सापशिडी मुलांना खेळायला देतो या जागी हा ज्ञानपट दिला तर किती बरे होईल .मुल संस्कारिक बनतील अधिकाधिक हो कि नाही ?
ज्ञानपटा च्या कल्पने करिता मी हि प्रतिमा बनवली आहे . आणि माउलींच्या कृपेने हा ज्ञानपट अजून तरी नेट वर उपलब्ध नाही कोठे .आता सर्वाना पहिला हि मिळेल माउली खूप खूप धन्यवाद कि आपण मला हे बनवण्याची संधी दिली .
आदरणीय पारख यांच्या ज्ञानेश्वर चरित्रावरून तसेच गुलाबराव महाराज माधानकर यनि सुद्धा हा पट छापून प्रसिद्ध केला आहे इतकाच कि पुस्तकात .
धन्यवाद !
कसा वाटला ते नक्की कळवां
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Thursday, 12 September 2013

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
मागील पोस्ट मध्ये आपण पाहिल कि जस म्हणतल मुक्ताई ह्या योगमाया आदिशक्तीचा अवतार आहेत तश्याच पद्धतीने आपले अनेक संत देवांचे अवतार आहेत तयंची थोडक्यात माहित देण्याचा प्रयत्न करत आहे . खालील प्रतिमेत त्यांची सविस्तर म्हणजेच कोण कोणाचा अवतार हे सांगण्यात आल आहे . आणखी त्याप्रमाणे बरेच अवतारी संत आहेत , त्यंची सर्व यादी देणे अशक्य आहे . हे केवळ दिग्दर्शन क्ले . या सर्व अवतारांची करणे वेगवेगळी आहेत . काही अवतरा शापमूलक तर काही वासनिक तर काही इच्छेने घेतलेले असे आहेत . या सर्वांच्या कथा सकळ संत गाथेत व पुराणात आल्या आहेत . अमुक अमक्याचा अवतार आहे , असे वर्णन तय तय स्थानी आले आहे . त्या कथा दिल्यास खूप मोठी पोस्ट होईल आणि तितका type करण्यास मला अभ्यसा खेरीज असलेला वेळ अपुरा पडतोय त्याबद्दल क्षमस्व !
आणि म्हत्वाच अस कि अवतार हि कल्पना फक्त नि फक्त हिंदू धर्मातच आहे , हे वैशिष्ट्य आहे .
या करिता अनमोल सहकार्य लाभल ते ह भ प . निवृत्ती महराज वक्ते यांचा “ श्री मुक्ताई चरित्र ” या ग्रंथाचे त्यांना हि धन्यवाद .
लवकरच भेटू नव्या एक विषयासोबत .....
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी ! 
सकाळ पासून पाहतोय घरात रेलचेल चालू आहे मोदक काय लाडू काय करंजी मिठाई काही कमीच नाही पदार्थंची ...तेव्हा समझल  अरे हो आज गौरी पूजन म्हणतल थोडस गौरि विषयी माझ्या तुमच्या माउलींच्या सर्वांच्या लाडक्या मुक्ताई आदिशक्ती विषयी थोडस सांगाव ..
आज गौरी आवाहान ....आणि आपण पाहतोय माउली आणि गणपती ! 
गणपती म्हंटला कि गौरि माता ह्या आल्याच मग म्हणतल गौरी अर्थातच योगमायेचा अवतार नाही का मग थोड माझ्या गौरी मातेच जाणून घेऊ त्या म्हणजेच मुक्ताई !
माउलींच्या जीवनातील एक अत्यंत प्रेमळ व्यकती त्या म्हणजे मुक्ताई ....हो आपण आज याच मुक्ताई संदर्भात जाणून घेणार आहोत .तो असा कि ,
ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला , तिचे वर्णन श्रीमदभागवतात दह्व्या स्कंदात योगमायेच्या रूपाने केले आहे . जिला दुर्गा , भद्रकाली , विजया , वैष्णवी , कुमुद , चंडिका , कृष्ण , माधवी , कन्यका , माया , नारायणी , ईशानी , शारदा व अंबिका अशी महाविष्णूने चौदा नवे दिली आहेत , त्या योगमायेचाच 'अवतार ' माझ्या श्री मुक्ताबाई आहेत . हि तिन्ही देवांची जननी आहे , असे श्री . निळोबाराय म्हणतात -
"मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी | आद्यत्रय जननी देवाचिया "
याचा रथ असा मायेच्या सत्वगुणापासून विष्णू झाला व राजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तामोगुणा पासून शंकर झाले . ''मायोपाधी शिव बोलिजेती " असे अभंगात म्हटले आहे .
shiv तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही |
सोपान तो ब्र्ह्मा मुळमाया मुक्ताई ||
हे चित्कळाचि अमुते दिसते कुमारी |
जिच्या प्रभेसी तुळणा ण पावे तमारी || (- निरंजन माधव )
मुक्ती मुक्त उघडी जगदीश लीला ||
दावावया प्रगटली भुवनैकलीला ||
आदि शक्ती मुक्ताबाई | सासी जनी लागे पायी || ( जनाबाई अभंग गाथा )
"मुख्ताख्या ब्रह्म चित्कला " याप्रमाणे मुळमाया म्हणा , आदिशक्ती म्हणा , किवा सद्रूप , चिद्रूप , आनंदरूप जे ब्रह्म त्यांपैकी चिद्रूप म्हणजे चित्कला तोच मुक्ताईनच " "अवतार " आहे .
सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया | आनंद पदी जया म्हणती हरी ||१||
अवतार शब्दाचे विवरण - तृ - धातूचे अव उपसर्गपूर्वक अवतार बनले आहे . - तृ - तरती = म्हणजे तरणे तृ या धातूस आव हा उपसर्ग लागला असता अवतरीत असे होते व अवतरीत म्हणजे खाली उतरतो , यावरून येणाऱ्यांचा अवतार असतो . श्री तुकोबाराय म्हणतात -
आम्ही वैकुंठवासी | आलो याची कारणासी ||
वैकुंठा तून खाली आले आहेत , तसेच हि भावंडे हि अवतारी आहेत .
" येथे उपकारासाठी | आले घर ज्या वैकुंठी ||
ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले | उध्दरावया आले दिन जना ||"
असे या भावंडाचे वर्णन केले आहे .
हि चारी भावंडे अवतारी असली तरी देवाचा अवतार आहेत कि , संताचा अवतार आहेत ? म्हणजे हे पूर्वजन्मात संत होते कि योगभ्रष्ट होते कि ,सिद्धयोगी कि , युंजान योगी होते ? याचा विचार केला असता हे वरील कोणत्याही कोटीत न बसता प्रत्यक्ष ईश्वराचाच "अवतार'' आहेत ..इतकच मला या प्रसंगी सांगयचं होत ..
सदरहू माहिती करिता अनमोल सहकार्य ते म्हणजे प.पू. श्री निवृत्ती महराज वक्ते त्यानाही वंदन ...
लवकरच येतोय घेऊन नवीन काही उदा : कोण कुणाचा अवतार ?
सध्या तरी इथेच जय हरी .
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Monday, 9 September 2013

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरि ! 
संपूर्ण गणेश उत्सव आपण पाहणार आहोत गणेश महात्म्य , स्तुती , थोड्या पौराणिक कथा आणि माउलींनी केलेलं गणेश स्मरण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ...या आधी आपण पाहिलं ते म्हणजे ज्ञानेश्वरीतील अध्याय प्रथम मधील गणेश स्तुती स्तवन ओव्या त्याच सम माउलींच्या १७ व्या अध्याय मध्ये देखील सुरवातील ओवी म्हणजेच अध्याय प्रारंभी माउलींनी ओवी क्रमांक १ ते ८ यात हि गणेश भगवंतच वर्णन केलय ते अस कि , ( क्षमा करा कि मी इथे ओव्या त्या देत नाही कारण एकच मला माहित आहे आपण सर्व नियमित ज्ञानेश्वरी वाचतात पण जे वाचत नाही ते माझ्या मते चीकीत्से पोटी तरी नक्कीच या ओव्यांच अर्थातच श्री .ज्ञानेश्वरीच वाचन करतील इतकाच स्वार्थ माझा ! )
माउली म्हणतात सुरुवातीलाच
" विश्वविकसितमुद्रा | जया सोडवी तुझी योगनिद्रा |
तया नमो जीव गणेंद्रा | सद्गुरू तुज || "
अर्थातच तुझी योगमाया विश्वविकासित मुद्रा प्रगट करते व जीवरूपी गणांचा तू स्वामी असलेलेया सद्गुरु , तुला नमस्कार असो . पूर्वी त्रीपुरासुराचा वाढ करताना शंकर भगवंताला गणपतीची स्तुती करावी लागली होते तो प्रसंग मनात अन्णून ज्ञानेश्वर महराज म्हणतात कि , सत्व - राज - तमरुपी शहरणी वेढलेला व जीवभावरुपी किल्ल्यात अडकलेला , जो आपला तमा , तो गुरुरूपी तू जो गणेश , त्या तुझे स्मरण करून शिवाने सोडवला , म्हणून तुझी तुलना शिवाबरोबर केली तर तूच अधिक श्रेष्ठ आहेस . तू मुमुक्षु जीवना मायारूपी जळातून तारतोस . जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत , त्यांच्या पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना सन्मुखच आहेस .हे म्हणताना माउली म्हणतात ती ओवी खालील प्रमाणे ,
" जे तुझ्याविखी मूढ | तयांलागी तू वक्रतुंड |
ज्ञानियासी तरी अखंड | उजूचि आहासि || "
श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १७ ओवी क्रमांक ४
गणराया तुझे डोळे पहिले तर बारीक आहेत ; तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात म्हणजेच ज्ञांनाच्या संकोचत व विकीअसात , जगाचे उत्पती व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता , प्रवृत्ती रुपी कानच्या हल्ण्याने , गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वर सुटला , त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले . त्या जीवभ्रमररुपी निळ्या कमळानि तू पुजला गेला आहेस . नंतर जेभा निवृत्तीरूपी कानाच्या हल्ण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते ; तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस . मायेचा लास्यविलास म्हणजेच नृत्य क्रीडा हा जग्दृपी आभास आणि त्यातील कौशल्य म्हणजे मायेचे आपल्या नृत्यक्रीडेत जगदाभासरुपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस .( आणि आपल्यायला तर सर्वानांच माहित आहे गणपती १४ विद्या ६४ कलांचा देवता आहे )
व पुढे माउली अध्यायच निरूपन करतात आपण सध्या तरी इतकच पाहणार आहोत कारण आपण पाहतोय माउलींचा गणेश ..! 
विशेष सहकार्य :- आदरणीय . दा .दा . रानडे जी तयंचे हि आभार .
सर्व ज्येष्ठ तथा तमाम वाचकांना विनंती यात काही चुका असतील तर नक्कीच कळवां .
पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत .....तो पर्यंत जय हरी !
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Sunday, 8 September 2013

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
श्री गणेशया नम : 
बंधू भगिनीनो ,
मागील भागात माउलींनी केलेल गणेश वंदना स्तुती गणेशाच रुपा विषयी आपण पाहिलत 
आता थोडस त्यापुढच म्हणजे अस कि ,
आज गणेश चतुर्थी ( एकदा बोला बर तुम्ही गणपती बप्पा मोरया ! मंगल मूर्ती मोरया ! आता वाटतय न गणपती आले,  )प्रत्येक व्यक्ती ला हवा हवासा वाटणार ते म्हणजे गणेशाच रूप लह्णान पासून थोरांपर्यंत सर्वानाच ओढ असते ती गणेशाच्या आगमनाची , कधी एकदा माझ्या बाप्पांच आगमण होतय आणि त्यांना मी पाहतोय अस माझच काय सर्वांचच अस असत , जीवात कालवा कालव होत असते बाप्पांना पाहीन वर्षभरातील सर्व चंगल्या वाईट गोष्टी बाप्पांच्या कानावर घालीन अस अगदी झालेलं असत , कोणाची नोकरी लागली तर कुणाला मुल झाल , शिक्षण पूर्ण झाल इत्यादी मोठी रंग लागेल सांगयचं झाल तर ...अशी सगळी गणपती बप्पांच्या माघे सर्व रीघ तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक मोरया ...माझी बाकी काही नाही स्वताला तर काहीच नको फक्त इतकाच कि हे जग सुखी वाहव , सर्वत आनंदी आनंद असावं , माझ्या तमाम आई बहिणी सुरक्षित असावयात बाप्पा काय हे अजून किती दिवस तू माझ सगळ ऐकतो ना मी माउलीना म्हणटल आई काय ग हेय अजून किती दिवस हे अस जगन तर मला आई ने सांगितल बाळा बाप्पा येणार न आता त्यांना सांग ते करतील सर्व ठीक आणि मी तर आहेच न सदैव तुझ्याबरोबर म्हणून बाप्पा तुला सगळ सांगितल ...
आणि मला खात्री आहे कारण त्याला मी सांगितलय काय माहिती आहे का “o my friend ganesha tu rahna sath hamesha !! “
तर मित्रानो आज आपण असच जाणून घेणार आहोत याच माझ्या बाप्पाच जीवन जे काही माझ्या वाचनात पाहण्यात आल !
आपल्या पुराणांचा संदर्भ घेवून मग आता पाहूतर गणेश भगवंताला
गणेश पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या कारणाने एक मुख्य देवता आहे. म्हणून ही देवता नाना आख्यान-उपाख्यानात, वेगवेगळ्या पुराण व महाकाव्यात उल्लेखित आहे. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्वाची कहाणी म्हणजे गणपतीचे गजाननहोणे होय. प्रत्येक पुराणाच्या वर्ण्यविषयानुसार या प्रसंगावर विविध भाष्य पाहायला मिळतात. इतका की यामुळे पुराणांमध्ये काही ठिकाणी परस्पर-विरोधही दिसतो. याशिवाय गणपतीच्या मातृपितृभक्ती व विवाहाविषयीच्या अनेक कथा वाचायल्या मिळतात
पुराणांतील जन्मकथा
• शिवपुराण – शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीसझुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा ता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
• स्कंदपुराण – स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरिरावर चढवले.
स्कंपुराणाच्या- ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. नंतर तेथे येऊन स्नानागारात जाणार्या शंकरास बालकाने अडवले. शंकरासोबतच्या युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले. या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.
स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्हाूड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.
• बृहद्धर्मपुराण – बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले. पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.
• ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असताशंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणार्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक ऊडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघंना जीवित केले. शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती,विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला.शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले.
ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.
• पद्मपुराण – पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.
• लिंगपुराण – लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.
• वराहपुराण – वराहपुराणानुसार , देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपति झाला. या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.
• देवीपुराण – देवीपुराणानुसार, शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला.
• मत्स्यपुराण – मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगा वपार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.
• वामनपुराण – वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जातः पुत्रकः (मला सोडूनही पुत्र जन्म झाला) त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल.
माझ्या बप्पाची इतर आख्याने
• ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.
• शिवपुराण – शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत - रिद्धी(बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छीत होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.
• तन्त्र – तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.
• महाभारत – महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सार्या घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती - लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली - अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.

आणि अजून थोड माझ्या दृष्टीने महत्वाच वाट आपणास सांगाव प्रत्येकालाच संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून लगेच गणेश शब्द नामक कुठे आलाय हे सापडण थोडस कठीण भेटेल पण सहसा लगेच वेल नसतो म्हणून सर्वांसाठीच व विशेषता त्यांच्यासाठी 
रात्रभर ज्ञानेश्वारीतले अनेक अध्यायांच वाचन मनन केल माउलींच्या श्री . ज्ञानेश्वरीत गणपती देवाच गणेश या शब्दाने आलेल्या माउलींच्या ओव्या ओवी आणि तिचा संदर्भ म्हणजे आपणास पाहयची असेल तर लगेच भेटेल आपणास हि :- 
गणेश :- तैसे प्रयाग होत सामरस्यांचे | वरी वोसाण तरत सात्विकाचें | ते सवांदच्तुष्प् थींचे | गणेश जाहले || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १० श्लोक ०९ ओवी क्रमांक १२४ 
गणेशाचीच :- चौथ मोटकी पाहे | आणि गानेशाचाचि होये | चवदसी म्हणे माये | तुझाच वो दुर्गे || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १३ श्लोक ११ ओवी क्रमांक ८१८ 
गणेशु :- देवा तूंची गणेशु | सकलार्थमतीप्रकाशु | म्हणे निवृत्ती दासू | अवधारिजो जी || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी क्रमांक २ 
गणेशु :- आत्मरूप गणेशु स्मरण | सकळ विद्यांचे अधिकरण | तेची वंदू श्रीचरण | श्री गुरुचे || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १३ ओवी क्रमांक १ 
या करिता मोलाच सहकार्य मार्गदर्शन मला लाभल ते म्हणजे आदरणीय पद्माकर जी कुलकर्णी त्यांना हि सादर प्रणाम ! 

आणि एक आपण जो फोटो पाहताय तो आहे ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधीचा प्रत्येक सणाप्रमाणे त्या त्या भगवंतच रूप आम्ही माउलीतच पाहतो . संजीवन समाधीला असलेला श्री .गणेश भगवंताचा मुखवटा ...
( प्रतिमे करिता धन्यवाद संत ज्ञानेश्वर महराज संस्थान कमिटी , आळंदी )
पुनश्च एकदा श्री गणेशाचरणी व मझ्या ज्ञानेश्वर माउलीनचरणी लीन होऊन इतकच सांगू इच्छितो कि माउली सर्वांच कल्याण करो आपल्या सर्वांच्या जीवनात भर भराटी येओ , हास्य सर्वांच्या मुखकमलावर सदैव राहो , आपल जीवन सत्कर्मी लागो परमार्थ आपल्याकडून घडो ....( माउलींच्या भाषेत सांगयचं झ्हाल तर माउलीच पसायदान अगदी तेच सर्वाना प्राप्त होवो )
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
( टीप :- आपल्या सूचनांच / मार्गदर्शनाच सदैव स्वागत राहील. )