Sunday, 23 June 2013



Sunday, 16 June 2013



इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची

ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे

उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबा
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे

उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाईइंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची

ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे

उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

Thursday, 13 June 2013

    || श्री पांडुरंग ||
श्री विठ्ठल माहात्म्य

 

       पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
 पुराणातील श्लोकाप्रमाणे 
                   वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
                  ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||

अर्थ- 
वि- विधाता- ब्रम्हदेव 
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर 
ल- लक्ष्मीकांत- विष्णू 
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.   
            || श्रीविठ्ठल मुर्तीवर्णन ||       
        दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. 
           श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.
             द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
          श्रीकृष्णास असलेल्या मुख्य  ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.

    पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.            

   पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात
|| पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||
संकलन :-

अक्षय भोसले 

Wednesday, 12 June 2013

वारकरी संप्रदाय byअक्षय भोसले ( Akshay Bhosale)


वारकरी संप्रदायाचा इतिहास :  

 वारकरी संप्रादायाचा उगम - वारकरी संप्रादायाचा उगम निश्चितपणे सागणे कठिण आहे, कारण हा स्वतंत्र संप्रदाय अथवा नवीन बंडखोर विचारधारा नसुन भारत वर्षात वेद काळापासुन चालत आलेल्या औपनिषदिय तत्वज्ञान परंपरेची वाटचाल आहे. वारकरी संप्रादायाचे आराध्य दैवत श्री पांडूरंग परमात्मा म्हणजेच वेदामध्ये आढळणारे विष्णू देवता अथवा पुरूष सुक्तातील देवतेची स्वरूप मानण्यात येते. श्री विठठल भगवान म्हणजेच वेद बोधीत जगताची स्थिती राखणारी विष्णु देवता असेही सिदध करता येते.   

      वेदकाळ व वेदोत्तर काळात कर्म काळात प्राधाण्याने प्रतिपादन करण्यार्या परंपरेसोबत ज्ञानाची परंपरा होती. वेदाच्या अंतिम भागातील उपनिषदामध्ये आढळणारे परिपुर्ण तत्वज्ञान हे वारकरी संप्रादायाचे मुळ उगम स्त्रोत म्हणता येईल. वेदामधील किचकट कर्म कांडाविरोधात उसळलेल्या बौदध धर्माच्या लाटेत वेदामधील ज्ञानप्रधान तत्वज्ञानही नाकारले जावु लागले. हिंदू धर्मातील औपनिषदीय तत्वज्ञानाची पुनर्स्थापना करण्याचे आसेतु हिमाचल वेदांत तत्वज्ञानाची सिंह गर्जना पसरविण्याचे कार्य भगवान शंकराचे अवतार मानल्या गेलेल्या श्रीमत् आद्य शंकराचार्यानी केले. आद्य शंकराचार्यानी अव्दैत वेदांत शास्त्राचे पुनरूज्जीवन केले. 

        आचार्यानी श्रीक्षेत्र पंढरपुरला दिलेली भेट व पांडूरंगाष्टकम् ची निर्मिती आचार्याच्या काळातील श्री विठठल भक्तीची वैभव शाली परंपरा - वाटचाल दाखवते वारकरी संप्रादायाच्या मुळ तत्वज्ञान परंपरेचा मागोवा जरी उपनिषद् काळापंर्यत घेता येत असला, श्री विठठल भक्तीच्या पाउल खुणा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यत प्रकट रुपाने आढळत असल्यातरी वारकरी संप्रदाय हे नामभिधान धारण करुन वारकरी संप्रदाय श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेवराय याच्या काळातच नावारुपाला आला. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातही ही संप्रदायाची परंपरा पसरली. आद्य शंकराचार्याच्या अव्दैत तत्वज्ञान पुनर्स्थापनेनंतर ही व्दैताव्देत शुध्दाव्दैत, केवलाव्दैत अशी परंपरा चालु राहिली. या परंपरामध्येही श्री विठठल उपासना स्विकारली गेली, म्हणुनच वारकरी संप्रादायाप्रमाणे श्री विठठल उपासना करणारी परंपरा कर्नाटकात, आंध्रात निर्माण झाली. तत्वज्ञान दृष्टया भेद स्विकारून ही सर्व श्री विठठलाचे भक्त झाले. मात्र या परंपरांचा व वारकरी संप्रादायाचा संबंध श्री विठठल भक्ती व सगुणोपासना या सारख्या ठराविक मुदयावरच सारखा आढळतो. मात्र विस्तार संत परंपरा व विकसीत होत गेलेली. भक्तीची परंपरा या गोष्टीत भिन्न आढळते. 

      श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान महाराज, ब्रहमचित्कला मुक्ताबाई या चार भावंडाबरोबरच भक्त शिरोमणी नामदेवराय, श्री संत सावता माळी महाराज, श्री संत चोखोबा व या संत प्रभावळीतील अनेक संतानी बाराव्या शतकात वारकरी सांप्रदाय समृध्द केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीभगवतगीतेवर केलेली मराठी टिका-भावार्थ दिपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग गाथा व इतरही संतांचे साक्षात्कारी अनुभूतीप्रधान अभंग हे मराठी भाषेचे अक्षर वैभव ठरले. याच काळात महाराष्ट्रात सर्वदूर तळागाळापर्यत श्री विठठल भक्ती पोहचली. वारकरी सांप्रदयाची सर्वसमावेशकता आचरण सुलभता व अभंगाची भाषा यामुळे सांप्रदायाचा विस्तार झाला. मात्र याच काळातील परकीय आक्रमणे व परकीय सत्तेच्या टाचेखाली चिरडलेली जनता स्वसामर्थ्य हरवून बसली. परधर्मियांच्या आक्रमणामुळे धर्माच्या बाहय गोष्टी पुन्हा बळावल्या. तत्वज्ञान व अंतरंग गोष्टी बंदिस्त झाल्या. हा सुमारे तीनशे वर्षाचा कालावधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अंधकारमय रात्र ठरली. 

     16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात चैतन्य जागृत झाले. महाराष्ट्रांच्या बुध्दीच्या तलवारीला व शौर्याच्या समशेरीला पुन्हा धार चढली. महाराष्ट्रात वारकरी सांप्रदयात अवतरलेल्या शांतीब्रहम एकनाथ महाराज व त्यानंतर लगेच अवतीर्ण झालेल्या जगदगुरू तुकोबारायांनी वारकरी सांप्रदायावर झळझळीत सुवर्णाचा कळस चढवला. या वारकरी सांप्रदायाच्या दुसर्या लाटेने संपुर्ण महाराष्ट्र ढवळुन काढला. या महाराष्ट्राच्या मातीत, माणसाच्या मनात बीजरुपाने पुर्वीपासुन बसणार्या वारकरी भक्तीभावाला खतपाणी मिळुन महाराष्ट्रा व्यापी वारकरी सांप्रदायाचा वटवृक्ष फोफावला. विविध जातीत, विविध भागात अवतरलेल्या संतांनी वटवृक्षाच्या पारब्याप्रमाणे सांप्रदायाचे तत्वज्ञान त्या भागात पोहचवलेच व सांप्रदायाला खंबीर आधार दिला. या कालावधीत जगदगुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील चौदा टाळकर्यांनी व शिष्य निळोबारायांनी सांप्रदायाचा ध्वज फडकवत ठेवला. जगदगुरू तुकाराम महाराजांचे पुत्र संत श्री नारायण महाराजांनी यांनी सुरू केलेल्या पंढरी वारी-पालखी सोहळयाने सांप्रदायाला एक नविन सहभागाचे परिमाण लाभले. शिंदे सरकारचे सरदार श्री हैबतबाबा आरफळकर यांनी पालखी सोहळयात सुसूत्रता आणुन पालखी सोहळयाची भव्यता वाढवली. 
संकलन :- 

अक्षय भोसले .