वारकरी संप्रदायाचा इतिहास :
वारकरी संप्रादायाचा उगम - वारकरी संप्रादायाचा उगम निश्चितपणे सागणे कठिण आहे, कारण हा स्वतंत्र संप्रदाय अथवा नवीन बंडखोर विचारधारा नसुन भारत वर्षात वेद काळापासुन चालत आलेल्या औपनिषदिय तत्वज्ञान परंपरेची वाटचाल आहे. वारकरी संप्रादायाचे आराध्य दैवत श्री पांडूरंग परमात्मा म्हणजेच वेदामध्ये आढळणारे विष्णू देवता अथवा पुरूष सुक्तातील देवतेची स्वरूप मानण्यात येते. श्री विठठल भगवान म्हणजेच वेद बोधीत जगताची स्थिती राखणारी विष्णु देवता असेही सिदध करता येते.वेदकाळ व वेदोत्तर काळात कर्म काळात प्राधाण्याने प्रतिपादन करण्यार्या परंपरेसोबत ज्ञानाची परंपरा होती. वेदाच्या अंतिम भागातील उपनिषदामध्ये आढळणारे परिपुर्ण तत्वज्ञान हे वारकरी संप्रादायाचे मुळ उगम स्त्रोत म्हणता येईल. वेदामधील किचकट कर्म कांडाविरोधात उसळलेल्या बौदध धर्माच्या लाटेत वेदामधील ज्ञानप्रधान तत्वज्ञानही नाकारले जावु लागले. हिंदू धर्मातील औपनिषदीय तत्वज्ञानाची पुनर्स्थापना करण्याचे आसेतु हिमाचल वेदांत तत्वज्ञानाची सिंह गर्जना पसरविण्याचे कार्य भगवान शंकराचे अवतार मानल्या गेलेल्या श्रीमत् आद्य शंकराचार्यानी केले. आद्य शंकराचार्यानी अव्दैत वेदांत शास्त्राचे पुनरूज्जीवन केले.
आचार्यानी श्रीक्षेत्र पंढरपुरला दिलेली भेट व पांडूरंगाष्टकम् ची निर्मिती आचार्याच्या काळातील श्री विठठल भक्तीची वैभव शाली परंपरा - वाटचाल दाखवते वारकरी संप्रादायाच्या मुळ तत्वज्ञान परंपरेचा मागोवा जरी उपनिषद् काळापंर्यत घेता येत असला, श्री विठठल भक्तीच्या पाउल खुणा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यत प्रकट रुपाने आढळत असल्यातरी वारकरी संप्रदाय हे नामभिधान धारण करुन वारकरी संप्रदाय श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेवराय याच्या काळातच नावारुपाला आला. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातही ही संप्रदायाची परंपरा पसरली. आद्य शंकराचार्याच्या अव्दैत तत्वज्ञान पुनर्स्थापनेनंतर ही व्दैताव्देत शुध्दाव्दैत, केवलाव्दैत अशी परंपरा चालु राहिली. या परंपरामध्येही श्री विठठल उपासना स्विकारली गेली, म्हणुनच वारकरी संप्रादायाप्रमाणे श्री विठठल उपासना करणारी परंपरा कर्नाटकात, आंध्रात निर्माण झाली. तत्वज्ञान दृष्टया भेद स्विकारून ही सर्व श्री विठठलाचे भक्त झाले. मात्र या परंपरांचा व वारकरी संप्रादायाचा संबंध श्री विठठल भक्ती व सगुणोपासना या सारख्या ठराविक मुदयावरच सारखा आढळतो. मात्र विस्तार संत परंपरा व विकसीत होत गेलेली. भक्तीची परंपरा या गोष्टीत भिन्न आढळते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान महाराज, ब्रहमचित्कला मुक्ताबाई या चार भावंडाबरोबरच भक्त शिरोमणी नामदेवराय, श्री संत सावता माळी महाराज, श्री संत चोखोबा व या संत प्रभावळीतील अनेक संतानी बाराव्या शतकात वारकरी सांप्रदाय समृध्द केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीभगवतगीतेवर केलेली मराठी टिका-भावार्थ दिपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग गाथा व इतरही संतांचे साक्षात्कारी अनुभूतीप्रधान अभंग हे मराठी भाषेचे अक्षर वैभव ठरले. याच काळात महाराष्ट्रात सर्वदूर तळागाळापर्यत श्री विठठल भक्ती पोहचली. वारकरी सांप्रदयाची सर्वसमावेशकता आचरण सुलभता व अभंगाची भाषा यामुळे सांप्रदायाचा विस्तार झाला. मात्र याच काळातील परकीय आक्रमणे व परकीय सत्तेच्या टाचेखाली चिरडलेली जनता स्वसामर्थ्य हरवून बसली. परधर्मियांच्या आक्रमणामुळे धर्माच्या बाहय गोष्टी पुन्हा बळावल्या. तत्वज्ञान व अंतरंग गोष्टी बंदिस्त झाल्या. हा सुमारे तीनशे वर्षाचा कालावधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अंधकारमय रात्र ठरली.
16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात चैतन्य जागृत झाले. महाराष्ट्रांच्या बुध्दीच्या तलवारीला व शौर्याच्या समशेरीला पुन्हा धार चढली. महाराष्ट्रात वारकरी सांप्रदयात अवतरलेल्या शांतीब्रहम एकनाथ महाराज व त्यानंतर लगेच अवतीर्ण झालेल्या जगदगुरू तुकोबारायांनी वारकरी सांप्रदायावर झळझळीत सुवर्णाचा कळस चढवला. या वारकरी सांप्रदायाच्या दुसर्या लाटेने संपुर्ण महाराष्ट्र ढवळुन काढला. या महाराष्ट्राच्या मातीत, माणसाच्या मनात बीजरुपाने पुर्वीपासुन बसणार्या वारकरी भक्तीभावाला खतपाणी मिळुन महाराष्ट्रा व्यापी वारकरी सांप्रदायाचा वटवृक्ष फोफावला. विविध जातीत, विविध भागात अवतरलेल्या संतांनी वटवृक्षाच्या पारब्याप्रमाणे सांप्रदायाचे तत्वज्ञान त्या भागात पोहचवलेच व सांप्रदायाला खंबीर आधार दिला. या कालावधीत जगदगुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील चौदा टाळकर्यांनी व शिष्य निळोबारायांनी सांप्रदायाचा ध्वज फडकवत ठेवला. जगदगुरू तुकाराम महाराजांचे पुत्र संत श्री नारायण महाराजांनी यांनी सुरू केलेल्या पंढरी वारी-पालखी सोहळयाने सांप्रदायाला एक नविन सहभागाचे परिमाण लाभले. शिंदे सरकारचे सरदार श्री हैबतबाबा आरफळकर यांनी पालखी सोहळयात सुसूत्रता आणुन पालखी सोहळयाची भव्यता वाढवली.
संकलन :-
No comments:
Post a Comment