||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
संत ज्ञानेश्वर आणि श्री गणेश भगवंत
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
श्री गणेशांच्या आगमण आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रतच न्हवे संपूर्ण जगात सर्वत्र होईल ..माझा आपल्या सर्वांचा गणेश उत्सव आता येईलच , गणराजाची ओढ तर सर्वांनाच आहे तशी मला हि ..म्हणटल गणेशाविषयी थोड सांगाव पण नंतर विचार केला मी कोण सांगणारा माझ ऐकण्यापेक्षा माझ्या माउलींचच आईका नाही का ? मी फक्त ते मांडण्याच प्रयत्न करतो माउलींच्या कृपेने !
माउलींची ज्ञानेश्वरी वाचनास घेतली कि सुरवातीलाच गणेश स्तवन म्हणा अथवा गणेश नमन आपणास दिसते म्हणटल थोड त्याविषयी सविस्तर मांडव म्हणून हा छोटा प्रयत्न ..!
त्यात प्रथम माउलींची ओवी येईल मग लगेचच अर्थ असा क्रम ठेवलाय .कि जेणेकरून वाचक वर्गास सहजतेने जे मला मांडायचय ते सहज कळून येईल इतकच ..
माउलींच्या ज्ञानेश्वरीतील प्रथम अध्याय : अर्जुनविषादयोग
माउलींनी जगाला विश्वाला जो महान असा ग्रंथ दिला तो म्हणजे श्री .ज्ञानेश्वरी
बघा न माउली म्हणतात गणेश भगवंताला नमन करून "ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||१||
म्हणजेच ॐकार हाच परमात्मा आहे , असे कल्पून माझे ज्ञानेश्वर माउली म्हणतात कि , सर्वांचे मुळ असणाऱ्या आणि वेदांताच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ॐ करा , मी तुला नमस्कार करतो . स्वतः ला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकरा , तुझा जयजयकार असो . (१)
देवा तूंची गणेशु | सकलार्थमतीप्रकाशु | म्हणे निवृत्ती दासू | अवधारिजो जी || २ ||
म्हणजेच देवा , सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश , तो तूच आहेस . निवृतीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महराज म्हणतात , संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे .(२)
हे शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष। जेथ वर्णवपु निर्दोष। मिरवत असे॥३॥
स्मृति तेचि अवेव। देखा आंगीक भाव। तेथ लावण्याची ठेव। अर्थशोभा॥४॥
अष्टादश पुराणे। तींचि मणिभूषणे। पदपध्दती खेवणे। प्रमेयरत्नांची॥५॥
पदबंध नागर। तेचि रंगाथिले अंबर। जेथ साहित्य वाणे सपूर। उजाळाचे॥६॥
म्हणजेच ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात कि , मन्वादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव आहेत . त्या स्मृतीतील अर्थसौंदर्यामुळे ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत . अठरा पुराण हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत आणि त्यात सांगितलेली तत्वे हीच रत्न आहेत आणि शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदने आहेत . उत्तम प्रकारची शब्दरचना हेच श्री गणेशाच्या अंगावरील रंगवलेली वस्त्रे आहे आणि शब्द रचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम धागे आहे . जर काव्यनाटकांविषयी कौतुकाने विचार केला , तर ती काव्य नाटके गणपतीच्या पायांतील लहान घागऱ्या आहेत आणि त्यांचा अर्थरूप आवाज रुणझुणत आहे . त्यात सांगितलेली अनेक प्रकारची तत्वे आणि त्यांतील कुशलता यांचा बारकाइने विचार केला असता यांमध्ये काही चांगली रत्न आढळतात . व्यासादिकांची बुद्धी हाच गणपतीच्या कमरेला बांधलेले शेला आहे आणि त्यांच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत (३-६)
देखा काव्यनाटका। जे र्निधरिता सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका। अर्थध्वनि॥७॥
नाना प्रमेयांची परी। निपुणपणे पाहता कुसरी। दिसती उचित पदे माझारी। रत्ने भली॥८॥
तेथ व्यासादिकांच्या मती। तेचि मेखळा मिरविती। चोखळपणे झळकती। पल्लवसडका॥९॥
देखा षडदर्शने म्हणिपती। तेचि भुजांची आकृती। म्हणोनि विसंवादे धरती। आयुधे हाती ||१० ||
तरी तर्कु तोचि फरशु। नीतिभेदु अंकुशु। वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे॥११॥
एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। तो बॉद्धमत संकेतु। वार्तिकाचा॥१२॥
मग सहजे सत्कारवादु। तो पद्मकरु वरदु। धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु। अभयहस्तु॥१३॥
म्हणजेच सहा शास्त्रे म्हणजेच गणपतीचे सहा हात आहेत आणि एकमेकांशी ण जुळणारी मते हीच त्या हातातील शस्त्रे आहेत.
तर्कशास्त्ररुपी हातामध्ये अनुमानरूपी परशु आहे . न्याय शास्त्र्रूपी हातात तत्वभेदरुपी अंकुश आहे . वेदांत सूत्र रुपी हातात ब्रह्मज्ञानरुपी मोदक शोभतो आहे . बौध्द मताचे निदर्शन करणारा खंडीत असलेला दात , एका हातात धरला आहे . बौद्धांचा शून्य वादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणेश भगवंताचा वर देणारा हात आहे आणि धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा आणि अभय देणारा हात आहे . ( गणेशाची षडभूजाकृत मूर्ती ठाणे , मुंबई येथील एका मंदिरात आहे . माउलींच्या ओवी प्रमाणे ती बनवून घेण्यात आली आहे मूर्ती )(७-१३)
देखा विवेकवंतु सुविमळु। तोचि शुंडादंडु सरळु। जेथ परमनंदु केवळु। महासुखाचा॥१४॥
अर्थातच त्या गणेश भगवंताची समर्थ अशी लांब सोंड सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद देणारी आहे . ती सरळ , अति निर्मळ आणि बर्यावाईटाची निवड करणारी आहे .(१४)
तरी संवादु तोचि दशनु। जो समता शुभ्रवर्णु। देवो उन्मेषसूक्ष्मक्षणु। विघ्नराजु॥१५॥
मज अवगमलिया दोनी। मीमंसा श्रवणस्थानी। बोधमदांमृत मुनी। अली सेविती॥१६॥
म्हणजेच माउली म्हणतात उत्तम संवाद हाच त्या गणेश भगवंताचा दात आहे आणि त्यातील पक्षरहितपणा हा त्याचा दाताचा पांढरा रंग आहे . ज्ञानरूप बारीक डोळे असलेला हा देव विघ्नांचा नियामक आहे . गणपतीचे दोन कर्ण अर्थात दोन कान म्हणजे पूर्वमीमांसा आणि उत्तरमिमांसा हि शस्त्रे आहेत . आणि बोध हे त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्या अमृताचे सेवन करतात .(१५-१६)
प्रमेयप्रवाल सुप्रभ। द्वॅताद्वॅत तेचि निकुंभ। सरिसेपणे एकवट इभ। -मस्तकावरी॥१७॥
उपरि दशोपनिषदे। जिये उदारे ज्ञानमकरंदे। तिये कुसुमे मुगुटी सुगंधे। शोभती भली॥१८॥
श्रुतीस्मृती मध्ये हि सांगितलेली प्रमये गणपतीच्या अंगावरील तेजस्वी पोवळी आहेत आणि द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गणपतीच्या मस्तकावरील गंडस्थळे आहेत . ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली दशोपनिषदरुपी सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटावर फारच शोभून दिसतात .(१७ - १८ )
अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे॥१९॥
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रम्ह कवळले। ते मियां श्रीगुरुकृपे नमिले। आदिबिज॥२०॥
म्हणजेच माउली सांगतात ॐ कराची प्रथम आकारमात्रा , हे गणपतीचे दोन पाय आहेत , दुसरी उकारमात्र हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकारमात्रा वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे . ह्या तिन्ही मात्र एकवटल्या म्हणजेच शब्दब्रह्म कवटाळले जाते . त्या मुळ बीजरूपी ॐ कर रुपी गणेश भगवंताला मी गुरु कृपेने नमस्कार करतो अस माउली म्हणतात (१९-२०) चला तर मग मौलिनी नमस्कार केला तर मग आपण पण करूया श्री . गणेशाय नम : ( टीप :- आपणास जी वरील चित्रात जी गणेशाची मूर्ती दिसती न ती मूर्ती हीच जिच माउलींनी १९ आणि २० व्या ओवीत वर्णन केल ती )
आता अभिनव वाग्विलासिनी। जे चातुर्याथकलाकामिनी। ते शारदा विश्वमोहिनी। नमस्कारिली मियां॥२१॥
पुढे गणेशाला वंदन करून माउली वाणीची अपूर्व क्रीडा करणारी , चातुर्य , अर्थ आणि कला यांची जी देवता आहे जीने सर्व जग मोहून टाकले आहे , त्या सरस्वतीला माउली नमस्कार करतात ( चला तर मग आपण हि करूया "या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥॥ " )
मज हृदयी सदगुरु। जेणे तारिला हा संसारपूरु। म्हणॉनि विशेषे अत्यादरु। विवेकावरी॥२२॥
जॅसे डोळ्या अंजन भेटे। ते वेळी दृष्टीसि फांटा फुटे। मग वास पाहिजे तेथ प्रगटे। महानिधी॥२३॥
कां चिंतामणी आलिया हाती। सदा विजयवृत्ती मनोरथी। तॅसा मी पुर्णकाम श्रीनिवृत्ति। ज्ञानदेवो म्हणे॥२४॥
म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे। तेणे कृतकार्य होइजे। जॅसे मुळसिंचने सहजे। शाखापल्लव संतोषती॥२५॥
कां तिर्थे जिये त्रिभुवनी। तिये घडती समुद्रावगाहनी। ना तरी अम्रुतरसास्वादनी। रस सकळ॥२६॥
तॅसा पुढतपुढती तोचि। मियां अभिवंदिला श्रीगुरुचि। जो अभिलषित मनोरुचि। पुरविता तो॥२७॥
म्हणजेच माउली म्हणतात ज्यांनी मला संसारपुरातून तारले , ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत , म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे .ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्या वेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी मिळाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात ; त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्रीनिवृत्तीनाथांमुळे पूर्ण झाले असे माउली म्हणतात . अहो ज्ञात पूरषहो , एवढ्याकरिता गुरूंना भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य वाहवे . ज्याप्रमाणे झाडांच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने यांना आपोआपच टवटवी येते अथवा समुद्रात स्नान केल्यामुळे तिन्ही लोकात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते ; त्याप्रमाणे श्रीगुरुवंदनात सर्वांचे वंदन होत असल्यामुळे मी इच्छित कामना पूर्ण करणाऱ्या श्री गुरुणा वारंवार नमन करतो .(२२-२७)
माझ्या बांधवानो पहा मौलिनी इथे पुन्हा गुरूच म्हत्व्व किती हे पटवून दिल . व मौलिनी गणेश भगवंताला त्रिवार नमन केल .
व पुढे महाभारतात गीता निर्माण झली त्या खोल विचारणी भरलेल्या कथेचे महत्म्य सृष्टीतील एक आणि एक घटकांचा समवेश करून अगदी सोप्या भाषेत सांगतात .
आणि हा माउलींचा ग्रंथ अर्थातच ज्ञानेश्वरी कशी वाचावी याच अध्यायातील ओवी क्रमांक ५६ , ५७ ,५८ ,५९ सुरेख वर्णन आहे .
याकरिता मला अत्यंत मोलाच मार्गदर्शन लाभल ते म्हणजेच आदरणीय . पूज्य विष्णू शंकर उर्फ दादाजी मराठे याचं त्यांचे तसेच त्यांच्या श्री , ज्ञानदेव सेवा मंडळ , ठाणे यांचा मी सदैव ऋणी राहीन .
गणेशा विषयी आपणा सर्वाना माहितच आहे हे मला माहित आहे परंतु आपल्या माहिती अधिक भर पढावी ते हि गणरायच्या आगमनापूर्वी अन्यथा मी गणेश चतुर्थी साठी हि पोस्ट तयार केली होती पण आता प्रसारित केली तर तो पर्यंत सर्वानपर्यंत पोहचेल ... यासाठी लाहनसा प्रयत्न काही चुकल असेल तर नक्कीच कळवा ..शेवटी मी हि आपल्या मुलाप्रमाणे "बोलीले लेकरू वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध "
Copyright © All Rights Reserved.
feel free to share
इतक सर्व सांगून आता आपली रजा घेतो भेटू नक्कीच नव्या विषया सोबत लवकरच ..........
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२