Friday, 13 September 2013

|| श्री ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
माउलींच्या जीवनातील काही भाग ...आज इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय .
आई वडील गेल्यावर हि भावंडे बरेच दिवस आपेगावी राहिली , असे मुक्ताबाईंच्या अभंगावरून दिसते ., निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न | संभाळी सोपान मजलागी || मुक्ताबाई म्हणतात , ' देवा आईवडील गेले तेव्हा मी लहान होते . निवृत्ती व ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न मागण्यास जात असत .' ( कारण तिथे अपेगावी ब्राह्मणांची घेरे नसल्यामुळे मराठ्यांकडेच भिक्षा मागावी लागत होते व तयंचे शिजलेले अन्न कसे घेतील ? म्हणून कोरान्नाचे अन्न मागत असत .) जेव्हा निवृत्ती व ज्ञानेश्वर कोरान्न मागण्यास जात असत , तेव्हा सोपानदेव घरी मुक्ताई ला सांभाळीत असे . त्यांना करमणूक म्हणून निवृत्तीनाथांनी निवृत्तिपट व ज्ञानेश्वरांनी ज्ञान पट ( आपण जी प्रतिमा खाली पाहता तोच हा ज्ञानपट असे खेळण्याकरिता करून दिले होते . ते खेळण्याची रीत अशी कि ,या ज्ञान पटात १ ते ७३ व निवृत्तिपटात १ ते ८५ अंक आहेत . प्रत्येक अंकांना जन्म , माया वैगेरे संज्ञा आहेत . काही साधन वाची व काही फलवाचि संज्ञा आहेत . शुभ कर्माचे फल उत्तम लोकांची प्राप्ती व अशुभ कर्माचे फल अधोगती असे आहे . उदा . ज्ञान पटात १० अंकाची संज्ञा ताप आहे . तय्तून शिडी निघून ती स्वर्ग या तेवीस अंकाच्यात गेले आहे . शिडीने वर जायचे . तसेच यात काही साप आहे त्या सापाच्या मुखातून खाली शेवट असेल त्या गृहात जायचे . याची खेळण्याची रीत अशी कि , हातात सहा कवड्या घेऊन डाव टाकावा .तय्त जेवढ्या कवड्या चित्त पडतील , तितके अंक मोजून गोटी पुढे पुढे वर सरकवत जाने . जर शिडीच्या घरात गोटी गेली तर एकदम शिडी जेथवर जाईल तिथ पर्यंतवर जाने व कदाचित सापाच्या मुखात गेली कि मग त्याच्या शेपुटाच्या घरात जाने . शेवटी असेखेळता खेळता ज्याची मोक्षाच्या घरात गेली ज्याची गोटी तो जिंकला व दुसरा हरला . हा दोघांचच खेळ आहे . सध्या आपण सापशिडी मुलांना खेळायला देतो या जागी हा ज्ञानपट दिला तर किती बरे होईल .मुल संस्कारिक बनतील अधिकाधिक हो कि नाही ?
ज्ञानपटा च्या कल्पने करिता मी हि प्रतिमा बनवली आहे . आणि माउलींच्या कृपेने हा ज्ञानपट अजून तरी नेट वर उपलब्ध नाही कोठे .आता सर्वाना पहिला हि मिळेल माउली खूप खूप धन्यवाद कि आपण मला हे बनवण्याची संधी दिली .
आदरणीय पारख यांच्या ज्ञानेश्वर चरित्रावरून तसेच गुलाबराव महाराज माधानकर यनि सुद्धा हा पट छापून प्रसिद्ध केला आहे इतकाच कि पुस्तकात .
धन्यवाद !
कसा वाटला ते नक्की कळवां
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Thursday, 12 September 2013

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
मागील पोस्ट मध्ये आपण पाहिल कि जस म्हणतल मुक्ताई ह्या योगमाया आदिशक्तीचा अवतार आहेत तश्याच पद्धतीने आपले अनेक संत देवांचे अवतार आहेत तयंची थोडक्यात माहित देण्याचा प्रयत्न करत आहे . खालील प्रतिमेत त्यांची सविस्तर म्हणजेच कोण कोणाचा अवतार हे सांगण्यात आल आहे . आणखी त्याप्रमाणे बरेच अवतारी संत आहेत , त्यंची सर्व यादी देणे अशक्य आहे . हे केवळ दिग्दर्शन क्ले . या सर्व अवतारांची करणे वेगवेगळी आहेत . काही अवतरा शापमूलक तर काही वासनिक तर काही इच्छेने घेतलेले असे आहेत . या सर्वांच्या कथा सकळ संत गाथेत व पुराणात आल्या आहेत . अमुक अमक्याचा अवतार आहे , असे वर्णन तय तय स्थानी आले आहे . त्या कथा दिल्यास खूप मोठी पोस्ट होईल आणि तितका type करण्यास मला अभ्यसा खेरीज असलेला वेळ अपुरा पडतोय त्याबद्दल क्षमस्व !
आणि म्हत्वाच अस कि अवतार हि कल्पना फक्त नि फक्त हिंदू धर्मातच आहे , हे वैशिष्ट्य आहे .
या करिता अनमोल सहकार्य लाभल ते ह भ प . निवृत्ती महराज वक्ते यांचा “ श्री मुक्ताई चरित्र ” या ग्रंथाचे त्यांना हि धन्यवाद .
लवकरच भेटू नव्या एक विषयासोबत .....
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी ! 
सकाळ पासून पाहतोय घरात रेलचेल चालू आहे मोदक काय लाडू काय करंजी मिठाई काही कमीच नाही पदार्थंची ...तेव्हा समझल  अरे हो आज गौरी पूजन म्हणतल थोडस गौरि विषयी माझ्या तुमच्या माउलींच्या सर्वांच्या लाडक्या मुक्ताई आदिशक्ती विषयी थोडस सांगाव ..
आज गौरी आवाहान ....आणि आपण पाहतोय माउली आणि गणपती ! 
गणपती म्हंटला कि गौरि माता ह्या आल्याच मग म्हणतल गौरी अर्थातच योगमायेचा अवतार नाही का मग थोड माझ्या गौरी मातेच जाणून घेऊ त्या म्हणजेच मुक्ताई !
माउलींच्या जीवनातील एक अत्यंत प्रेमळ व्यकती त्या म्हणजे मुक्ताई ....हो आपण आज याच मुक्ताई संदर्भात जाणून घेणार आहोत .तो असा कि ,
ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला , तिचे वर्णन श्रीमदभागवतात दह्व्या स्कंदात योगमायेच्या रूपाने केले आहे . जिला दुर्गा , भद्रकाली , विजया , वैष्णवी , कुमुद , चंडिका , कृष्ण , माधवी , कन्यका , माया , नारायणी , ईशानी , शारदा व अंबिका अशी महाविष्णूने चौदा नवे दिली आहेत , त्या योगमायेचाच 'अवतार ' माझ्या श्री मुक्ताबाई आहेत . हि तिन्ही देवांची जननी आहे , असे श्री . निळोबाराय म्हणतात -
"मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी | आद्यत्रय जननी देवाचिया "
याचा रथ असा मायेच्या सत्वगुणापासून विष्णू झाला व राजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तामोगुणा पासून शंकर झाले . ''मायोपाधी शिव बोलिजेती " असे अभंगात म्हटले आहे .
shiv तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही |
सोपान तो ब्र्ह्मा मुळमाया मुक्ताई ||
हे चित्कळाचि अमुते दिसते कुमारी |
जिच्या प्रभेसी तुळणा ण पावे तमारी || (- निरंजन माधव )
मुक्ती मुक्त उघडी जगदीश लीला ||
दावावया प्रगटली भुवनैकलीला ||
आदि शक्ती मुक्ताबाई | सासी जनी लागे पायी || ( जनाबाई अभंग गाथा )
"मुख्ताख्या ब्रह्म चित्कला " याप्रमाणे मुळमाया म्हणा , आदिशक्ती म्हणा , किवा सद्रूप , चिद्रूप , आनंदरूप जे ब्रह्म त्यांपैकी चिद्रूप म्हणजे चित्कला तोच मुक्ताईनच " "अवतार " आहे .
सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया | आनंद पदी जया म्हणती हरी ||१||
अवतार शब्दाचे विवरण - तृ - धातूचे अव उपसर्गपूर्वक अवतार बनले आहे . - तृ - तरती = म्हणजे तरणे तृ या धातूस आव हा उपसर्ग लागला असता अवतरीत असे होते व अवतरीत म्हणजे खाली उतरतो , यावरून येणाऱ्यांचा अवतार असतो . श्री तुकोबाराय म्हणतात -
आम्ही वैकुंठवासी | आलो याची कारणासी ||
वैकुंठा तून खाली आले आहेत , तसेच हि भावंडे हि अवतारी आहेत .
" येथे उपकारासाठी | आले घर ज्या वैकुंठी ||
ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले | उध्दरावया आले दिन जना ||"
असे या भावंडाचे वर्णन केले आहे .
हि चारी भावंडे अवतारी असली तरी देवाचा अवतार आहेत कि , संताचा अवतार आहेत ? म्हणजे हे पूर्वजन्मात संत होते कि योगभ्रष्ट होते कि ,सिद्धयोगी कि , युंजान योगी होते ? याचा विचार केला असता हे वरील कोणत्याही कोटीत न बसता प्रत्यक्ष ईश्वराचाच "अवतार'' आहेत ..इतकच मला या प्रसंगी सांगयचं होत ..
सदरहू माहिती करिता अनमोल सहकार्य ते म्हणजे प.पू. श्री निवृत्ती महराज वक्ते त्यानाही वंदन ...
लवकरच येतोय घेऊन नवीन काही उदा : कोण कुणाचा अवतार ?
सध्या तरी इथेच जय हरी .
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Monday, 9 September 2013

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरि ! 
संपूर्ण गणेश उत्सव आपण पाहणार आहोत गणेश महात्म्य , स्तुती , थोड्या पौराणिक कथा आणि माउलींनी केलेलं गणेश स्मरण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ...या आधी आपण पाहिलं ते म्हणजे ज्ञानेश्वरीतील अध्याय प्रथम मधील गणेश स्तुती स्तवन ओव्या त्याच सम माउलींच्या १७ व्या अध्याय मध्ये देखील सुरवातील ओवी म्हणजेच अध्याय प्रारंभी माउलींनी ओवी क्रमांक १ ते ८ यात हि गणेश भगवंतच वर्णन केलय ते अस कि , ( क्षमा करा कि मी इथे ओव्या त्या देत नाही कारण एकच मला माहित आहे आपण सर्व नियमित ज्ञानेश्वरी वाचतात पण जे वाचत नाही ते माझ्या मते चीकीत्से पोटी तरी नक्कीच या ओव्यांच अर्थातच श्री .ज्ञानेश्वरीच वाचन करतील इतकाच स्वार्थ माझा ! )
माउली म्हणतात सुरुवातीलाच
" विश्वविकसितमुद्रा | जया सोडवी तुझी योगनिद्रा |
तया नमो जीव गणेंद्रा | सद्गुरू तुज || "
अर्थातच तुझी योगमाया विश्वविकासित मुद्रा प्रगट करते व जीवरूपी गणांचा तू स्वामी असलेलेया सद्गुरु , तुला नमस्कार असो . पूर्वी त्रीपुरासुराचा वाढ करताना शंकर भगवंताला गणपतीची स्तुती करावी लागली होते तो प्रसंग मनात अन्णून ज्ञानेश्वर महराज म्हणतात कि , सत्व - राज - तमरुपी शहरणी वेढलेला व जीवभावरुपी किल्ल्यात अडकलेला , जो आपला तमा , तो गुरुरूपी तू जो गणेश , त्या तुझे स्मरण करून शिवाने सोडवला , म्हणून तुझी तुलना शिवाबरोबर केली तर तूच अधिक श्रेष्ठ आहेस . तू मुमुक्षु जीवना मायारूपी जळातून तारतोस . जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत , त्यांच्या पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना सन्मुखच आहेस .हे म्हणताना माउली म्हणतात ती ओवी खालील प्रमाणे ,
" जे तुझ्याविखी मूढ | तयांलागी तू वक्रतुंड |
ज्ञानियासी तरी अखंड | उजूचि आहासि || "
श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १७ ओवी क्रमांक ४
गणराया तुझे डोळे पहिले तर बारीक आहेत ; तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात म्हणजेच ज्ञांनाच्या संकोचत व विकीअसात , जगाचे उत्पती व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता , प्रवृत्ती रुपी कानच्या हल्ण्याने , गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वर सुटला , त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले . त्या जीवभ्रमररुपी निळ्या कमळानि तू पुजला गेला आहेस . नंतर जेभा निवृत्तीरूपी कानाच्या हल्ण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते ; तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस . मायेचा लास्यविलास म्हणजेच नृत्य क्रीडा हा जग्दृपी आभास आणि त्यातील कौशल्य म्हणजे मायेचे आपल्या नृत्यक्रीडेत जगदाभासरुपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस .( आणि आपल्यायला तर सर्वानांच माहित आहे गणपती १४ विद्या ६४ कलांचा देवता आहे )
व पुढे माउली अध्यायच निरूपन करतात आपण सध्या तरी इतकच पाहणार आहोत कारण आपण पाहतोय माउलींचा गणेश ..! 
विशेष सहकार्य :- आदरणीय . दा .दा . रानडे जी तयंचे हि आभार .
सर्व ज्येष्ठ तथा तमाम वाचकांना विनंती यात काही चुका असतील तर नक्कीच कळवां .
पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत .....तो पर्यंत जय हरी !
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Sunday, 8 September 2013

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
श्री गणेशया नम : 
बंधू भगिनीनो ,
मागील भागात माउलींनी केलेल गणेश वंदना स्तुती गणेशाच रुपा विषयी आपण पाहिलत 
आता थोडस त्यापुढच म्हणजे अस कि ,
आज गणेश चतुर्थी ( एकदा बोला बर तुम्ही गणपती बप्पा मोरया ! मंगल मूर्ती मोरया ! आता वाटतय न गणपती आले,  )प्रत्येक व्यक्ती ला हवा हवासा वाटणार ते म्हणजे गणेशाच रूप लह्णान पासून थोरांपर्यंत सर्वानाच ओढ असते ती गणेशाच्या आगमनाची , कधी एकदा माझ्या बाप्पांच आगमण होतय आणि त्यांना मी पाहतोय अस माझच काय सर्वांचच अस असत , जीवात कालवा कालव होत असते बाप्पांना पाहीन वर्षभरातील सर्व चंगल्या वाईट गोष्टी बाप्पांच्या कानावर घालीन अस अगदी झालेलं असत , कोणाची नोकरी लागली तर कुणाला मुल झाल , शिक्षण पूर्ण झाल इत्यादी मोठी रंग लागेल सांगयचं झाल तर ...अशी सगळी गणपती बप्पांच्या माघे सर्व रीघ तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक मोरया ...माझी बाकी काही नाही स्वताला तर काहीच नको फक्त इतकाच कि हे जग सुखी वाहव , सर्वत आनंदी आनंद असावं , माझ्या तमाम आई बहिणी सुरक्षित असावयात बाप्पा काय हे अजून किती दिवस तू माझ सगळ ऐकतो ना मी माउलीना म्हणटल आई काय ग हेय अजून किती दिवस हे अस जगन तर मला आई ने सांगितल बाळा बाप्पा येणार न आता त्यांना सांग ते करतील सर्व ठीक आणि मी तर आहेच न सदैव तुझ्याबरोबर म्हणून बाप्पा तुला सगळ सांगितल ...
आणि मला खात्री आहे कारण त्याला मी सांगितलय काय माहिती आहे का “o my friend ganesha tu rahna sath hamesha !! “
तर मित्रानो आज आपण असच जाणून घेणार आहोत याच माझ्या बाप्पाच जीवन जे काही माझ्या वाचनात पाहण्यात आल !
आपल्या पुराणांचा संदर्भ घेवून मग आता पाहूतर गणेश भगवंताला
गणेश पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या कारणाने एक मुख्य देवता आहे. म्हणून ही देवता नाना आख्यान-उपाख्यानात, वेगवेगळ्या पुराण व महाकाव्यात उल्लेखित आहे. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्वाची कहाणी म्हणजे गणपतीचे गजाननहोणे होय. प्रत्येक पुराणाच्या वर्ण्यविषयानुसार या प्रसंगावर विविध भाष्य पाहायला मिळतात. इतका की यामुळे पुराणांमध्ये काही ठिकाणी परस्पर-विरोधही दिसतो. याशिवाय गणपतीच्या मातृपितृभक्ती व विवाहाविषयीच्या अनेक कथा वाचायल्या मिळतात
पुराणांतील जन्मकथा
• शिवपुराण – शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीसझुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा ता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
• स्कंदपुराण – स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरिरावर चढवले.
स्कंपुराणाच्या- ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. नंतर तेथे येऊन स्नानागारात जाणार्या शंकरास बालकाने अडवले. शंकरासोबतच्या युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले. या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.
स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्हाूड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.
• बृहद्धर्मपुराण – बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले. पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.
• ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असताशंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणार्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक ऊडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघंना जीवित केले. शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती,विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला.शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले.
ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.
• पद्मपुराण – पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.
• लिंगपुराण – लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.
• वराहपुराण – वराहपुराणानुसार , देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपति झाला. या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.
• देवीपुराण – देवीपुराणानुसार, शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला.
• मत्स्यपुराण – मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगा वपार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.
• वामनपुराण – वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जातः पुत्रकः (मला सोडूनही पुत्र जन्म झाला) त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल.
माझ्या बप्पाची इतर आख्याने
• ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.
• शिवपुराण – शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत - रिद्धी(बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छीत होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.
• तन्त्र – तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.
• महाभारत – महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सार्या घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती - लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली - अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.

आणि अजून थोड माझ्या दृष्टीने महत्वाच वाट आपणास सांगाव प्रत्येकालाच संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून लगेच गणेश शब्द नामक कुठे आलाय हे सापडण थोडस कठीण भेटेल पण सहसा लगेच वेल नसतो म्हणून सर्वांसाठीच व विशेषता त्यांच्यासाठी 
रात्रभर ज्ञानेश्वारीतले अनेक अध्यायांच वाचन मनन केल माउलींच्या श्री . ज्ञानेश्वरीत गणपती देवाच गणेश या शब्दाने आलेल्या माउलींच्या ओव्या ओवी आणि तिचा संदर्भ म्हणजे आपणास पाहयची असेल तर लगेच भेटेल आपणास हि :- 
गणेश :- तैसे प्रयाग होत सामरस्यांचे | वरी वोसाण तरत सात्विकाचें | ते सवांदच्तुष्प् थींचे | गणेश जाहले || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १० श्लोक ०९ ओवी क्रमांक १२४ 
गणेशाचीच :- चौथ मोटकी पाहे | आणि गानेशाचाचि होये | चवदसी म्हणे माये | तुझाच वो दुर्गे || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १३ श्लोक ११ ओवी क्रमांक ८१८ 
गणेशु :- देवा तूंची गणेशु | सकलार्थमतीप्रकाशु | म्हणे निवृत्ती दासू | अवधारिजो जी || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी क्रमांक २ 
गणेशु :- आत्मरूप गणेशु स्मरण | सकळ विद्यांचे अधिकरण | तेची वंदू श्रीचरण | श्री गुरुचे || श्री . ज्ञानेश्वरी अध्याय १३ ओवी क्रमांक १ 
या करिता मोलाच सहकार्य मार्गदर्शन मला लाभल ते म्हणजे आदरणीय पद्माकर जी कुलकर्णी त्यांना हि सादर प्रणाम ! 

आणि एक आपण जो फोटो पाहताय तो आहे ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधीचा प्रत्येक सणाप्रमाणे त्या त्या भगवंतच रूप आम्ही माउलीतच पाहतो . संजीवन समाधीला असलेला श्री .गणेश भगवंताचा मुखवटा ...
( प्रतिमे करिता धन्यवाद संत ज्ञानेश्वर महराज संस्थान कमिटी , आळंदी )
पुनश्च एकदा श्री गणेशाचरणी व मझ्या ज्ञानेश्वर माउलीनचरणी लीन होऊन इतकच सांगू इच्छितो कि माउली सर्वांच कल्याण करो आपल्या सर्वांच्या जीवनात भर भराटी येओ , हास्य सर्वांच्या मुखकमलावर सदैव राहो , आपल जीवन सत्कर्मी लागो परमार्थ आपल्याकडून घडो ....( माउलींच्या भाषेत सांगयचं झ्हाल तर माउलीच पसायदान अगदी तेच सर्वाना प्राप्त होवो )
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
( टीप :- आपल्या सूचनांच / मार्गदर्शनाच सदैव स्वागत राहील. )

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||

हरतालिकेची माहिती आणि कथा

दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.
म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.
आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.
आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्‍यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?
उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.
वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.
आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.
सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्‍याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.
माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.
चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.
हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.
(टीप :- देवी उमाणी प्रेम केले ते भगवान शंकर होते इतक लक्षात ठेवा आपणास शंकर भेटन सध्या तस अवघड आहे या कलियुगात म्हणून सहसा घरच्यांची man कधी दुखवू नका कोणी हि गोष्ट करताना प्रथम कुटुंबाचा विचार करा इतकाच मला वाटल सांगाव म्हणून सांगितल )
आता मी पाहतो मुंबई पुणे सारख्या शहरात लहान लहान मुले म्हणतात आह्मी प्रेम करतो पण ते प्रेमे भावनेतून करा कामनेतून न करता मग का लागेल आपल्या आई बहिणींना संरक्षण फक्त सर्वांच्या मनात सर्व्न्विषयी हिताची , मदत करण्याची आदराची भावना पाहिजे पण मी वाट पाहतोय कधी एकदाच येतय राम राज्य !
प्रेम करा ते प्रथम आई बाबांवर ज्यांच्या मुळे आपण आहोत प्रेम करा आपल्या संतांवर प्रेम करा ते आपल्या संस्कृती परंपरेवर इतकाच माफ करा हा काही चुकल असेल अथवा एखाद्या व्यक्तीच मन दुखवल गेल असेल तर पण ते वाहव म्हणून तर लिहलय 
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२ .

Friday, 6 September 2013

||ज्ञानेशो भगवान विष्णू || राम कृष्ण हरी ! संत ज्ञानेश्वर आणि श्री गणेश भगवंत

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
संत ज्ञानेश्वर आणि श्री गणेश भगवंत
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
श्री गणेशांच्या आगमण आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रतच न्हवे संपूर्ण जगात सर्वत्र होईल ..माझा आपल्या सर्वांचा गणेश उत्सव आता येईलच , गणराजाची ओढ तर सर्वांनाच आहे तशी मला हि ..म्हणटल गणेशाविषयी थोड सांगाव पण नंतर विचार केला मी कोण सांगणारा माझ ऐकण्यापेक्षा माझ्या माउलींचच आईका नाही का ? मी फक्त ते मांडण्याच प्रयत्न करतो माउलींच्या कृपेने !
माउलींची ज्ञानेश्वरी वाचनास घेतली कि सुरवातीलाच गणेश स्तवन म्हणा अथवा गणेश नमन आपणास दिसते म्हणटल थोड त्याविषयी सविस्तर मांडव म्हणून हा छोटा प्रयत्न ..!
त्यात प्रथम माउलींची ओवी येईल मग लगेचच अर्थ असा क्रम ठेवलाय .कि जेणेकरून वाचक वर्गास सहजतेने जे मला मांडायचय ते सहज कळून येईल इतकच ..
माउलींच्या ज्ञानेश्वरीतील प्रथम अध्याय : अर्जुनविषादयोग
माउलींनी जगाला विश्वाला जो महान असा ग्रंथ दिला तो म्हणजे श्री .ज्ञानेश्वरी
बघा न माउली म्हणतात गणेश भगवंताला नमन करून "ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||१||
म्हणजेच ॐकार हाच परमात्मा आहे , असे कल्पून माझे ज्ञानेश्वर माउली म्हणतात कि , सर्वांचे मुळ असणाऱ्या आणि वेदांताच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ॐ करा , मी तुला नमस्कार करतो . स्वतः ला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकरा , तुझा जयजयकार असो . (१)
देवा तूंची गणेशु | सकलार्थमतीप्रकाशु | म्हणे निवृत्ती दासू | अवधारिजो जी || २ ||
म्हणजेच देवा , सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश , तो तूच आहेस . निवृतीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महराज म्हणतात , संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे .(२)
हे शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष। जेथ वर्णवपु निर्दोष। मिरवत असे॥३॥
स्मृति तेचि अवेव। देखा आंगीक भाव। तेथ लावण्याची ठेव। अर्थशोभा॥४॥
अष्टादश पुराणे। तींचि मणिभूषणे। पदपध्दती खेवणे। प्रमेयरत्नांची॥५॥
पदबंध नागर। तेचि रंगाथिले अंबर। जेथ साहित्य वाणे सपूर। उजाळाचे॥६॥
म्हणजेच ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात कि , मन्वादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव आहेत . त्या स्मृतीतील अर्थसौंदर्यामुळे ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत . अठरा पुराण हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत आणि त्यात सांगितलेली तत्वे हीच रत्न आहेत आणि शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदने आहेत . उत्तम प्रकारची शब्दरचना हेच श्री गणेशाच्या अंगावरील रंगवलेली वस्त्रे आहे आणि शब्द रचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम धागे आहे . जर काव्यनाटकांविषयी कौतुकाने विचार केला , तर ती काव्य नाटके गणपतीच्या पायांतील लहान घागऱ्या आहेत आणि त्यांचा अर्थरूप आवाज रुणझुणत आहे . त्यात सांगितलेली अनेक प्रकारची तत्वे आणि त्यांतील कुशलता यांचा बारकाइने विचार केला असता यांमध्ये काही चांगली रत्न आढळतात . व्यासादिकांची बुद्धी हाच गणपतीच्या कमरेला बांधलेले शेला आहे आणि त्यांच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत (३-६)
देखा काव्यनाटका। जे र्निधरिता सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका। अर्थध्वनि॥७॥
नाना प्रमेयांची परी। निपुणपणे पाहता कुसरी। दिसती उचित पदे माझारी। रत्ने भली॥८॥
तेथ व्यासादिकांच्या मती। तेचि मेखळा मिरविती। चोखळपणे झळकती। पल्लवसडका॥९॥
देखा षडदर्शने म्हणिपती। तेचि भुजांची आकृती। म्हणोनि विसंवादे धरती। आयुधे हाती ||१० ||
तरी तर्कु तोचि फरशु। नीतिभेदु अंकुशु। वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे॥११॥
एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। तो बॉद्धमत संकेतु। वार्तिकाचा॥१२॥
मग सहजे सत्कारवादु। तो पद्मकरु वरदु। धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु। अभयहस्तु॥१३॥
म्हणजेच सहा शास्त्रे म्हणजेच गणपतीचे सहा हात आहेत आणि एकमेकांशी ण जुळणारी मते हीच त्या हातातील शस्त्रे आहेत.
तर्कशास्त्ररुपी हातामध्ये अनुमानरूपी परशु आहे . न्याय शास्त्र्रूपी हातात तत्वभेदरुपी अंकुश आहे . वेदांत सूत्र रुपी हातात ब्रह्मज्ञानरुपी मोदक शोभतो आहे . बौध्द मताचे निदर्शन करणारा खंडीत असलेला दात , एका हातात धरला आहे . बौद्धांचा शून्य वादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणेश भगवंताचा वर देणारा हात आहे आणि धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा आणि अभय देणारा हात आहे . ( गणेशाची षडभूजाकृत मूर्ती ठाणे , मुंबई येथील एका मंदिरात आहे . माउलींच्या ओवी प्रमाणे ती बनवून घेण्यात आली आहे मूर्ती )(७-१३)
देखा विवेकवंतु सुविमळु। तोचि शुंडादंडु सरळु। जेथ परमनंदु केवळु। महासुखाचा॥१४॥
अर्थातच त्या गणेश भगवंताची समर्थ अशी लांब सोंड सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद देणारी आहे . ती सरळ , अति निर्मळ आणि बर्यावाईटाची निवड करणारी आहे .(१४)
तरी संवादु तोचि दशनु। जो समता शुभ्रवर्णु। देवो उन्मेषसूक्ष्मक्षणु। विघ्नराजु॥१५॥
मज अवगमलिया दोनी। मीमंसा श्रवणस्थानी। बोधमदांमृत मुनी। अली सेविती॥१६॥
म्हणजेच माउली म्हणतात उत्तम संवाद हाच त्या गणेश भगवंताचा दात आहे आणि त्यातील पक्षरहितपणा हा त्याचा दाताचा पांढरा रंग आहे . ज्ञानरूप बारीक डोळे असलेला हा देव विघ्नांचा नियामक आहे . गणपतीचे दोन कर्ण अर्थात दोन कान म्हणजे पूर्वमीमांसा आणि उत्तरमिमांसा हि शस्त्रे आहेत . आणि बोध हे त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्या अमृताचे सेवन करतात .(१५-१६)


प्रमेयप्रवाल सुप्रभ। द्वॅताद्वॅत तेचि निकुंभ। सरिसेपणे एकवट इभ। -मस्तकावरी॥१७॥
उपरि दशोपनिषदे। जिये उदारे ज्ञानमकरंदे। तिये कुसुमे मुगुटी सुगंधे। शोभती भली॥१८॥
श्रुतीस्मृती मध्ये हि सांगितलेली प्रमये गणपतीच्या अंगावरील तेजस्वी पोवळी आहेत आणि द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गणपतीच्या मस्तकावरील गंडस्थळे आहेत . ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली दशोपनिषदरुपी सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटावर फारच शोभून दिसतात .(१७ - १८ )





अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे॥१९॥
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रम्ह कवळले। ते मियां श्रीगुरुकृपे नमिले। आदिबिज॥२०॥
म्हणजेच माउली सांगतात ॐ कराची प्रथम आकारमात्रा , हे गणपतीचे दोन पाय आहेत , दुसरी उकारमात्र हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकारमात्रा वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे . ह्या तिन्ही मात्र एकवटल्या म्हणजेच शब्दब्रह्म कवटाळले जाते . त्या मुळ बीजरूपी ॐ कर रुपी गणेश भगवंताला मी गुरु कृपेने नमस्कार करतो अस माउली म्हणतात (१९-२०) चला तर मग मौलिनी नमस्कार केला तर मग आपण पण करूया श्री . गणेशाय नम : ( टीप :- आपणास जी वरील चित्रात जी गणेशाची मूर्ती दिसती न ती मूर्ती हीच जिच माउलींनी १९ आणि २० व्या ओवीत वर्णन केल ती )
आता अभिनव वाग्विलासिनी। जे चातुर्याथकलाकामिनी। ते शारदा विश्वमोहिनी। नमस्कारिली मियां॥२१॥
पुढे गणेशाला वंदन करून माउली वाणीची अपूर्व क्रीडा करणारी , चातुर्य , अर्थ आणि कला यांची जी देवता आहे जीने सर्व जग मोहून टाकले आहे , त्या सरस्वतीला माउली नमस्कार करतात ( चला तर मग आपण हि करूया "या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥॥ " )
मज हृदयी सदगुरु। जेणे तारिला हा संसारपूरु। म्हणॉनि विशेषे अत्यादरु। विवेकावरी॥२२॥
जॅसे डोळ्या अंजन भेटे। ते वेळी दृष्टीसि फांटा फुटे। मग वास पाहिजे तेथ प्रगटे। महानिधी॥२३॥
कां चिंतामणी आलिया हाती। सदा विजयवृत्ती मनोरथी। तॅसा मी पुर्णकाम श्रीनिवृत्ति। ज्ञानदेवो म्हणे॥२४॥
म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे। तेणे कृतकार्य होइजे। जॅसे मुळसिंचने सहजे। शाखापल्लव संतोषती॥२५॥
कां तिर्थे जिये त्रिभुवनी। तिये घडती समुद्रावगाहनी। ना तरी अम्रुतरसास्वादनी। रस सकळ॥२६॥
तॅसा पुढतपुढती तोचि। मियां अभिवंदिला श्रीगुरुचि। जो अभिलषित मनोरुचि। पुरविता तो॥२७॥
म्हणजेच माउली म्हणतात ज्यांनी मला संसारपुरातून तारले , ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत , म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे .ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्या वेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी मिळाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात ; त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्रीनिवृत्तीनाथांमुळे पूर्ण झाले असे माउली म्हणतात . अहो ज्ञात पूरषहो , एवढ्याकरिता गुरूंना भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य वाहवे . ज्याप्रमाणे झाडांच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने यांना आपोआपच टवटवी येते अथवा समुद्रात स्नान केल्यामुळे तिन्ही लोकात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते ; त्याप्रमाणे श्रीगुरुवंदनात सर्वांचे वंदन होत असल्यामुळे मी इच्छित कामना पूर्ण करणाऱ्या श्री गुरुणा वारंवार नमन करतो .(२२-२७)
माझ्या बांधवानो पहा मौलिनी इथे पुन्हा गुरूच म्हत्व्व किती हे पटवून दिल . व मौलिनी गणेश भगवंताला त्रिवार नमन केल .
व पुढे महाभारतात गीता निर्माण झली त्या खोल विचारणी भरलेल्या कथेचे महत्म्य सृष्टीतील एक आणि एक घटकांचा समवेश करून अगदी सोप्या भाषेत सांगतात .
आणि हा माउलींचा ग्रंथ अर्थातच ज्ञानेश्वरी कशी वाचावी याच अध्यायातील ओवी क्रमांक ५६ , ५७ ,५८ ,५९ सुरेख वर्णन आहे .
याकरिता मला अत्यंत मोलाच मार्गदर्शन लाभल ते म्हणजेच आदरणीय . पूज्य विष्णू शंकर उर्फ दादाजी मराठे याचं त्यांचे तसेच त्यांच्या श्री , ज्ञानदेव सेवा मंडळ , ठाणे यांचा मी सदैव ऋणी राहीन .
गणेशा विषयी आपणा सर्वाना माहितच आहे हे मला माहित आहे परंतु आपल्या माहिती अधिक भर पढावी ते हि गणरायच्या आगमनापूर्वी अन्यथा मी गणेश चतुर्थी साठी हि पोस्ट तयार केली होती पण आता प्रसारित केली तर तो पर्यंत सर्वानपर्यंत पोहचेल ... यासाठी लाहनसा प्रयत्न काही चुकल असेल तर नक्कीच कळवा ..शेवटी मी हि आपल्या मुलाप्रमाणे "बोलीले लेकरू वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध "
Copyright © All Rights Reserved.
feel free to share
इतक सर्व सांगून आता आपली रजा घेतो भेटू नक्कीच नव्या विषया सोबत लवकरच ..........
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

Monday, 2 September 2013

संतसाहित्य संकलन

|| श्री .ज्ञानेशो भगवान विष्णू ||
प्रथमता सर्वाना राम कृष्ण हरी ! सर्व संतसाहित्य वाचक , तमाम वारकरी बंधू भगिनी व इतर फेसबुक मित्रमंडळी सदर हु पोष्ट भरपूर मोठी आहे मी याचे भाग १ भाग २ ....पुढे अनेक भाग अस विग्रह केला असून .......
प्रथम भाग माउलींच्या चरणी समर्पित !
मी आता पर्यंत माउली कृपेने सद्गुरू कृपेने आई वडीलनच्या आशीर्वादाने केलेलं मनन चिंतन श्रवण या सर्वंच सार थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा एक छोटा प्रयत्न ....
सध्याची पिढी विशेषता युवा वर्ग यांची मानसिकता बदलत चालिय अस होता कामा नये ..आपले ग्रंथ संस्कृती हेच खर सोन त्याला विसरता कामा नये प्रेम या शब्दाची व्यख्याच यांनी बदलून टाकलीय ...
''प्रेम'' प्रेम म्हणजे नेमक काय ? सर्वच म्हणतात प्रेम वाईट असत, तर काही म्हणतात प्रेमात जे आहे ते कशातच नाही , तर काही म्हणतात प्रेम अंधळ असत , नामक काय मानायचं हा प्रश मला पडलाय ...तर मग आता पाहूच नेमक प्रेम म्हणजे काय माझ्या माउलींच काय मत आहे प्रेमाविषयी ते मी मानून चालणार .....त्या करिता सुंदर अशी माउलींची ओवी आहे ,





'' देखा नवल त्या प्रभूचे । अद्‍भुत प्रेम भक्ताचे । जो सारथ्य पार्थाचे । करितु असे ''
(श्री . ज्ञानेश्वरी श्लोक १४ ओवी १४२) भगवान श्री ज्ञानोबाराय माउली कृष्णाच्या प्रेमच वर्णन करतायत .देखा नवल त्या प्रभूचे - '' प्रभू '' शब्द ज्ञानोबाराय प्रगट करतायत ,सर्व सामर्थ्यशाली प्रभू ज्याच अस , देखा , पहा नवल त्या प्रभूच संपूर्ण विश्व ज्याला घाबरत त्याच नवल पहा आश्चर्य पहा देखा नवल त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे त्याला जोड कशी आहे भक्ताचे हि अद्भुत प्रेम ....,
संसार मध्ये ज्या रितेने आपण प्रेम करतो अस प्रेम नाही , अद्भुत प्रेम भक्ताचे काय विशेषता आहे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे ....संपूर्ण विश्व वर जायचं नियंत्रण आहे , क्षण मात्रामध्ये ज्याचे जगात उलाढाल होते , ज्याला विश्वात येण्याची गरज नाही , असा भगवान श्री कृष्ण परमात्मा सारथ्य पण पार्थाचे करीत असे . सारथ्य पण म्हणजे घोडे हाकलण्याच काम , वेग वेगळ्या पद्धतीने ज्ञानोबारायनी संपूर्ण ज्ञानेश्वरीत भगवंताच्या प्रेमाच वर्णन केलय . माणूस किती जरी मोठा असला , किती जरी श्रीमंत असला तरी त्याला अस वाटत कुणीतरी प्रेम करणारी एखादी वयक्ति असावी जिथ अंतकरण मोकळ केल जात असावं जिथे विश्वास असावा , ज्या ठिकाणी आपल्याला अस वाटत कुणी तरी माझ्या अंत करणातल्या चुका यांना शुद्धा शाबासकी देणार असावं . आपल्या अंतकरणात कुठेतरी प्रत्येकामध्ये वेडेपणा प्रतेयक ज्ञानी लोकांचं अंतकरणात असतोच , त्या वेडेपणाला शान म्हणणार कुणीतरी आसवं आपणा श्रीमंत आहोत जागच्या दृष्टीने आपण सामर्थ्यवान आहोत जगाच्या दृष्टीने आपण सत्ताधारी आहोत जागच्या दृष्टीने परंतु आपल्या अंतकरणात एक बोच प्रश्न रुक रुक असते जिथे अस वाट माणसाला प्रेम करणारी व्यक्ती हवी जगामध्ये सर्व काही मिळू शकते पण अवघड गोष्ट इतकी फक्त निष्ठावन व्यक्ती किंबहूना प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही , स्वार्थ परवश झालेली माणस पैसाच्या पोटी प्रेम करत आहे अस दाखवतात गरज आहे म्हणून पत्नी प्रेम करताना दाखवते ज्ञानची लालसा आहे म्हणून शिष्य प्रेम करताना गुरुवर दाखवतात पण अंतकरन ज्याला म्हणतात निख्खळ प्रेमाकरिता जन्माल आलेल अंतकरन हे अतिशय दुर्मिळ आहे ., भगवान कृष्णाच्या जन्मचा जर आपण इतिहास पहिला तर त्यांच्या रोमा रोमातून प्रेम बाहेर पडत परंतु भगवंतच म्हणतात प्रेम फार सुंदर आहे , मी एवढा जरी असलो संपूर्ण विश्व माझ्यावर प्रेम करत असल तरीही एक उणीव माझ्या जीवनात आहे कि मला प्रेम करणारी माणस मिळत नाहीत , ज्ञानाकरिता येणारी माणस भेटतात , माझ्याकडे सामर्थ्य आहे म्हणून माणस माझ्याकडे येतात पण माझ्यावर प्रेम करणारा एखादा व्यक्ती जो निख्खळ माझ्यावर प्रेम करतो माला वेडा म्हणत असताना जो घबरात नाही , मला बावळट म्हणत असताना जो घबरात नाही असा प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे ज्याच्यावर प्रेम असत त्यला आपण काय बोलतो त्याच्यापेक्षा त्यामागचा भाव जास्त महत्वाच मानला जातो , ज्ञानामधल आणि प्रेमामध्ये प्रमुख अंतर या पद्धतीच आहे कि , ज्ञानत भाषा अर्थपूर्ण असते आणि प्रेमात शब्द भावपूर्ण असतात , अज्ञानी माणसाला ज्ञान ज्ञानी बनवत , ज्ञानला प्रेम वेड लावत त्याला प्रेम म्हणतात . गुरुंकडे गेलो शस्त्राकडे गेलो पुस्तकांकडे गेलो आपण आपल्याला अस लक्षात येत कि ज्ञानी झाहलो पण प्रेम अशी वस्तू आहे कि ज्ञानाला वेड लावते वेगवेगळे प्रकार आहेत , मानवी जीवनातला एक गाभा आहे ज्याच्या विषयी माणूस जगू शकत नाही , प्रेम हृदयच भाव आहे , आपल्या शरीरात अशा बरयाच गोष्टी आहेत कि आपण ज्याचा वापर करत नाही , आपल्याला अस वाटत कि आपण त्याचा वापर करतोय पण मात्र संपूर्ण यंत्रणा वापरली जात नाही . शरीर पूर्ण वापरत नाही , बुद्धी पूर्ण वापरात नाही मग हृद्य तर फार खोल आहे जिथे प्रेमाचा गंध दरवळत असतो पण अप[ण तिथे कधी गेलोलो नसतो आपण आपल्याला ओळखलेल नसत कि आपल्यात किती प्रेम सामर्थ्य आहे म्हणून मानवी जीवनात सर्वात मोठी विशेषता जिथे माणूस समाधानी असतो ज्याच्याकरिता सर्वस्वाचा त्याग करतो ते म्हणजे प्रेम !
ज्ञाबोराया ज्या प्रेमच निरुपण करतात ते याच प्रेमाच , तो अखिल कोटी ब्र्ह्मानड नायक परमात्मा आहे त्याच नवल पहा कि तो एक सारथी आहे , भावा भावत जिथे भांडण होतात राज्याकरिता युध्द होतात पण अशा हि अवस्थेमध्ये अर्जुनाच्या जीवनात अनेक चुका झाल्यात , अर्जुन बोलत असताना चुकणार , चालत असताना चुकणार ,वावरताना चुकणार पण भगवंतच प्रेम अंधळ प्रेम आहे . कि जो ते अर्जुनाच्या चुकांकडे पाहत नाही अर्जुनाकडे पाहतात आणि अर्जुनाची दृष्टी अशी आहे कि प्रभू म्हणून भगवंतकडे ''माझा ''म्हणून म्हणून पाहतात . वडील आणि पुत्र यांच्यात चुका तपासल्या जात नाही , मझे पण किती याच्यावर प्रेम आधारित असत , आई ज्यावेळेस मुलाकडे पाहते मुलगा आईकडे पाहतो , या पाहण्याची दृष्टी ओळखणारी माणस फार कमी आहे जगात आपल्या लहन मुलाच पोट भरल याच समाधान जितक आईच्या अंतकरणात असत ते दुसर कोणी ओळखू शक्न्मार नाही , हे फार मोठ दुर्भ्ग्य प्रेम हे तोंडातून अभिव्यक्त केल जार नाही न्हवे न्हवे करता हि येत नाहि हो ....पुढे थोडा तुकोबारायनच चरित्रच भाग आहे ........उर्वरित पुढील भागत .....
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२ .
( माझ्याकडून झालेल्या लेखनातील त्रुटी व इतर काही बाबी आपण मला नक्की सांगाव्यात ..मी आपला ऋणी राहीन )

Sunday, 1 September 2013



|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी ,
आज अजा एकादशी , त्यात माझ भाग्य अस कि ठाणेतील एक एक अग्रगण्य आणि नावलौकिक असलेल श्री ज्ञानदेव सेवा मंडळ , ठाणे संस्था यांचे मिलिंदजी परचुरे यांच्या वतीने आणि प्रमुख विश्वस्त आदरणीय . श्री व सौ वामन शंकर तथा दादा मराठे (संकल्पना , संकलन , संपादन , शब्दांकन सर्व आदरणीय दादा मराठे याचं आहे प्रस्तुत पुस्तक रुपी ग्रंथास )यांचं शुभहस्ते ओवीरहित || सुलभ गद्य ज्ञानेश्वरी || हा ग्रंथ मला भेट देण्यात आला तो एक आनंददायी प्रसंग....
भरपूरच सुंदर ग्रंथ आहे ....
खूप खूप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले .