|| श्री .ज्ञानेशो भगवान विष्णू ||
प्रथमता सर्वाना राम कृष्ण हरी ! सर्व संतसाहित्य वाचक , तमाम वारकरी बंधू भगिनी व इतर फेसबुक मित्रमंडळी सदर हु पोष्ट भरपूर मोठी आहे मी याचे भाग १ भाग २ ....पुढे अनेक भाग अस विग्रह केला असून .......
प्रथम भाग माउलींच्या चरणी समर्पित !
मी आता पर्यंत माउली कृपेने सद्गुरू कृपेने आई वडीलनच्या आशीर्वादाने केलेलं मनन चिंतन श्रवण या सर्वंच सार थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा एक छोटा प्रयत्न ....
सध्याची पिढी विशेषता युवा वर्ग यांची मानसिकता बदलत चालिय अस होता कामा नये ..आपले ग्रंथ संस्कृती हेच खर सोन त्याला विसरता कामा नये प्रेम या शब्दाची व्यख्याच यांनी बदलून टाकलीय ...
''प्रेम'' प्रेम म्हणजे नेमक काय ? सर्वच म्हणतात प्रेम वाईट असत, तर काही म्हणतात प्रेमात जे आहे ते कशातच नाही , तर काही म्हणतात प्रेम अंधळ असत , नामक काय मानायचं हा प्रश मला पडलाय ...तर मग आता पाहूच नेमक प्रेम म्हणजे काय माझ्या माउलींच काय मत आहे प्रेमाविषयी ते मी मानून चालणार .....त्या करिता सुंदर अशी माउलींची ओवी आहे ,
प्रथमता सर्वाना राम कृष्ण हरी ! सर्व संतसाहित्य वाचक , तमाम वारकरी बंधू भगिनी व इतर फेसबुक मित्रमंडळी सदर हु पोष्ट भरपूर मोठी आहे मी याचे भाग १ भाग २ ....पुढे अनेक भाग अस विग्रह केला असून .......
प्रथम भाग माउलींच्या चरणी समर्पित !
मी आता पर्यंत माउली कृपेने सद्गुरू कृपेने आई वडीलनच्या आशीर्वादाने केलेलं मनन चिंतन श्रवण या सर्वंच सार थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा एक छोटा प्रयत्न ....
सध्याची पिढी विशेषता युवा वर्ग यांची मानसिकता बदलत चालिय अस होता कामा नये ..आपले ग्रंथ संस्कृती हेच खर सोन त्याला विसरता कामा नये प्रेम या शब्दाची व्यख्याच यांनी बदलून टाकलीय ...
''प्रेम'' प्रेम म्हणजे नेमक काय ? सर्वच म्हणतात प्रेम वाईट असत, तर काही म्हणतात प्रेमात जे आहे ते कशातच नाही , तर काही म्हणतात प्रेम अंधळ असत , नामक काय मानायचं हा प्रश मला पडलाय ...तर मग आता पाहूच नेमक प्रेम म्हणजे काय माझ्या माउलींच काय मत आहे प्रेमाविषयी ते मी मानून चालणार .....त्या करिता सुंदर अशी माउलींची ओवी आहे ,
'' देखा नवल त्या प्रभूचे । अद्भुत प्रेम भक्ताचे । जो सारथ्य पार्थाचे । करितु असे ''
(श्री . ज्ञानेश्वरी श्लोक १४ ओवी १४२) भगवान श्री ज्ञानोबाराय माउली कृष्णाच्या प्रेमच वर्णन करतायत .देखा नवल त्या प्रभूचे - '' प्रभू '' शब्द ज्ञानोबाराय प्रगट करतायत ,सर्व सामर्थ्यशाली प्रभू ज्याच अस , देखा , पहा नवल त्या प्रभूच संपूर्ण विश्व ज्याला घाबरत त्याच नवल पहा आश्चर्य पहा देखा नवल त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे त्याला जोड कशी आहे भक्ताचे हि अद्भुत प्रेम ....,
संसार मध्ये ज्या रितेने आपण प्रेम करतो अस प्रेम नाही , अद्भुत प्रेम भक्ताचे काय विशेषता आहे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे ....संपूर्ण विश्व वर जायचं नियंत्रण आहे , क्षण मात्रामध्ये ज्याचे जगात उलाढाल होते , ज्याला विश्वात येण्याची गरज नाही , असा भगवान श्री कृष्ण परमात्मा सारथ्य पण पार्थाचे करीत असे . सारथ्य पण म्हणजे घोडे हाकलण्याच काम , वेग वेगळ्या पद्धतीने ज्ञानोबारायनी संपूर्ण ज्ञानेश्वरीत भगवंताच्या प्रेमाच वर्णन केलय . माणूस किती जरी मोठा असला , किती जरी श्रीमंत असला तरी त्याला अस वाटत कुणीतरी प्रेम करणारी एखादी वयक्ति असावी जिथ अंतकरण मोकळ केल जात असावं जिथे विश्वास असावा , ज्या ठिकाणी आपल्याला अस वाटत कुणी तरी माझ्या अंत करणातल्या चुका यांना शुद्धा शाबासकी देणार असावं . आपल्या अंतकरणात कुठेतरी प्रत्येकामध्ये वेडेपणा प्रतेयक ज्ञानी लोकांचं अंतकरणात असतोच , त्या वेडेपणाला शान म्हणणार कुणीतरी आसवं आपणा श्रीमंत आहोत जागच्या दृष्टीने आपण सामर्थ्यवान आहोत जगाच्या दृष्टीने आपण सत्ताधारी आहोत जागच्या दृष्टीने परंतु आपल्या अंतकरणात एक बोच प्रश्न रुक रुक असते जिथे अस वाट माणसाला प्रेम करणारी व्यक्ती हवी जगामध्ये सर्व काही मिळू शकते पण अवघड गोष्ट इतकी फक्त निष्ठावन व्यक्ती किंबहूना प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही , स्वार्थ परवश झालेली माणस पैसाच्या पोटी प्रेम करत आहे अस दाखवतात गरज आहे म्हणून पत्नी प्रेम करताना दाखवते ज्ञानची लालसा आहे म्हणून शिष्य प्रेम करताना गुरुवर दाखवतात पण अंतकरन ज्याला म्हणतात निख्खळ प्रेमाकरिता जन्माल आलेल अंतकरन हे अतिशय दुर्मिळ आहे ., भगवान कृष्णाच्या जन्मचा जर आपण इतिहास पहिला तर त्यांच्या रोमा रोमातून प्रेम बाहेर पडत परंतु भगवंतच म्हणतात प्रेम फार सुंदर आहे , मी एवढा जरी असलो संपूर्ण विश्व माझ्यावर प्रेम करत असल तरीही एक उणीव माझ्या जीवनात आहे कि मला प्रेम करणारी माणस मिळत नाहीत , ज्ञानाकरिता येणारी माणस भेटतात , माझ्याकडे सामर्थ्य आहे म्हणून माणस माझ्याकडे येतात पण माझ्यावर प्रेम करणारा एखादा व्यक्ती जो निख्खळ माझ्यावर प्रेम करतो माला वेडा म्हणत असताना जो घबरात नाही , मला बावळट म्हणत असताना जो घबरात नाही असा प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे ज्याच्यावर प्रेम असत त्यला आपण काय बोलतो त्याच्यापेक्षा त्यामागचा भाव जास्त महत्वाच मानला जातो , ज्ञानामधल आणि प्रेमामध्ये प्रमुख अंतर या पद्धतीच आहे कि , ज्ञानत भाषा अर्थपूर्ण असते आणि प्रेमात शब्द भावपूर्ण असतात , अज्ञानी माणसाला ज्ञान ज्ञानी बनवत , ज्ञानला प्रेम वेड लावत त्याला प्रेम म्हणतात . गुरुंकडे गेलो शस्त्राकडे गेलो पुस्तकांकडे गेलो आपण आपल्याला अस लक्षात येत कि ज्ञानी झाहलो पण प्रेम अशी वस्तू आहे कि ज्ञानाला वेड लावते वेगवेगळे प्रकार आहेत , मानवी जीवनातला एक गाभा आहे ज्याच्या विषयी माणूस जगू शकत नाही , प्रेम हृदयच भाव आहे , आपल्या शरीरात अशा बरयाच गोष्टी आहेत कि आपण ज्याचा वापर करत नाही , आपल्याला अस वाटत कि आपण त्याचा वापर करतोय पण मात्र संपूर्ण यंत्रणा वापरली जात नाही . शरीर पूर्ण वापरत नाही , बुद्धी पूर्ण वापरात नाही मग हृद्य तर फार खोल आहे जिथे प्रेमाचा गंध दरवळत असतो पण अप[ण तिथे कधी गेलोलो नसतो आपण आपल्याला ओळखलेल नसत कि आपल्यात किती प्रेम सामर्थ्य आहे म्हणून मानवी जीवनात सर्वात मोठी विशेषता जिथे माणूस समाधानी असतो ज्याच्याकरिता सर्वस्वाचा त्याग करतो ते म्हणजे प्रेम !
ज्ञाबोराया ज्या प्रेमच निरुपण करतात ते याच प्रेमाच , तो अखिल कोटी ब्र्ह्मानड नायक परमात्मा आहे त्याच नवल पहा कि तो एक सारथी आहे , भावा भावत जिथे भांडण होतात राज्याकरिता युध्द होतात पण अशा हि अवस्थेमध्ये अर्जुनाच्या जीवनात अनेक चुका झाल्यात , अर्जुन बोलत असताना चुकणार , चालत असताना चुकणार ,वावरताना चुकणार पण भगवंतच प्रेम अंधळ प्रेम आहे . कि जो ते अर्जुनाच्या चुकांकडे पाहत नाही अर्जुनाकडे पाहतात आणि अर्जुनाची दृष्टी अशी आहे कि प्रभू म्हणून भगवंतकडे ''माझा ''म्हणून म्हणून पाहतात . वडील आणि पुत्र यांच्यात चुका तपासल्या जात नाही , मझे पण किती याच्यावर प्रेम आधारित असत , आई ज्यावेळेस मुलाकडे पाहते मुलगा आईकडे पाहतो , या पाहण्याची दृष्टी ओळखणारी माणस फार कमी आहे जगात आपल्या लहन मुलाच पोट भरल याच समाधान जितक आईच्या अंतकरणात असत ते दुसर कोणी ओळखू शक्न्मार नाही , हे फार मोठ दुर्भ्ग्य प्रेम हे तोंडातून अभिव्यक्त केल जार नाही न्हवे न्हवे करता हि येत नाहि हो ....पुढे थोडा तुकोबारायनच चरित्रच भाग आहे ........उर्वरित पुढील भागत .....
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२ .
( माझ्याकडून झालेल्या लेखनातील त्रुटी व इतर काही बाबी आपण मला नक्की सांगाव्यात ..मी आपला ऋणी राहीन )
No comments:
Post a Comment